रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास तेली आळी नाक्यावर घडली.अमन म्हापूसकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात राकेश गोविंद मकाने (19,रा.खालची आळी,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्या 2025 मध्ये गणपती विसर्जनावेळी मांडवी येथे काही कारणावरुन वाद झाले होते. ते वादा तेव्हा सामंजस्याने सोडवण्यात आले होते.दरम्यान, सोमवार 11 मे रोजी रात्री 11.30 वा.सुमारास फिर्यादी राकेश मकाने हा त्याचा मित्र पार्थ ठाकूर सोबत तेली आळी नाका येथील एका दुकानात सामान खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेला होता. ते दुचाकीवर बसलेल असताना संशयित अमन म्हापूसकर त्याठिकाणी आला त्याने आपल्या हातातील स्टिल धातूचे कडे काढून ते हातात पकडून फिर्यादी राकेच्या डोक्यात मागील बाजूस मारुन दुखापत केली. त्यानंतर त्याला ढकलून दिले. त्यावेळी पार्थ ठाकूरने त्यांचे भांडण सोडवले असता अमनने राकेशला तुला आता एवढेच मारले आहे तुला अजून मारेन अशी धमकी देउन निघून गेला. या मारहाणीत राकेशला दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल Read More »









