konkandhara.com

Entrepreneurship

konkandhara 73 2

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास

चिपळूण : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात भरदिवसा बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास झाला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी एकनाथ साळवी (वय ४९, रा. कोळकेवाडी, कुंभारवाडी) यांच्या घरात ही घटना दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. त्यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे एका चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवून कपाटात ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला आणि पर्समधील ३९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे २,१८,९०० रुपये), २७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ५,५०० रुपये) तसेच १०,००० रुपये रोख असा एकूण २,३४,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय पर्समध्ये ठेवलेली पॅनकार्ड, बँक ऑफ इंडिया पासबुक, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड आणि आधारकार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्याने लंपास केली. घटना लक्षात येताच अश्विनी साळवी यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३१ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक १७/२०२६) दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी आपल्या घरांची व मौल्यवान वस्तूंची योग्य ती सुरक्षा करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी; २.३४ लाखांचा ऐवज लंपास Read More »

Web Banner 7

कोकणात दमदार पावसाला सुरुवात, शेतीला मिळणार आधार

गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून कोकणात जोरात दाखल झाला असून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे.– ठिकाण: कोकण– महत्त्व: शेतीस मदत, जलसाठ्यांमध्ये वाढ

कोकणात दमदार पावसाला सुरुवात, शेतीला मिळणार आधार Read More »

Mumbai Metro 2

मुंबई मेट्रो लाईन १० व ११ ला केंद्राची अंतिम मंजुरी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम द्रुतगती मार्गावरून ठाणे जोडणाऱ्या मेट्रो लाईन १० आणि ११ प्रकल्पांना केंद्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. एकूण ४२ किमी लांबीच्या या मार्गावर ३८ स्थानकं असणार आहेत.– ठिकाण: मुंबई– महत्त्व: वाहतूक सुलभीकरण, रोजगारनिर्मि

मुंबई मेट्रो लाईन १० व ११ ला केंद्राची अंतिम मंजुरी Read More »