konkandhara.com

Editorial

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून मासेमारी करणाऱ्या नौकेवर मोठी कारवाई केली आहे. दि. ३ एप्रिल २०२६ च्या रात्री सुरू झालेल्या या मोहिमेत ४ एप्रिल रोजी पहाटे २.१७ वाजेच्या सुमारास ही नौका पकडण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी तथा जयगडचे परवाना अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे या आपल्या पथकासह नियमित गस्तीवर होत्या. यावेळी मिऱ्या-काळबादेवी समोर समुद्रात साधारण १०.८३ सागरी मैल (NM) अंतरावर ‘भराडी प्रसन्न’ (नोंदणी क्रमांक: IND-MH-04-MM-3723) ही नौका संशयास्पदरीत्या नांगरून उभी असल्याचे आढळले. या नौकेचे मालक श्री. कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर, रत्नागिरी) असून, नौकेकडे राज्याच्या जलधि क्षेत्रासाठी मासेमारी परवाना आहे. मात्र, ही नौका अनधिकृतपणे एल.ई.डी. लाईट लावून मासेमारी करण्याच्या उद्देशाने उभी असल्याचे निष्पन्न झाले.कठोर कायदेशीर पावलेकारवाईदरम्यान नौकेवर तांडेलसह ५ खलाशी मिळून आले. पथकाने नौकेवरील एल.ई.डी. लाईट आणि जनरेटरसह संपूर्ण नौका जप्त केली असून पुढील कार्यवाहीपर्यंत ती मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२१ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.यांनी बजावली भूमिकासदर मोहीम मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. यामध्ये अंमलबजावणी अधिकारी श्रीम. स्मितल कांबळे यांच्यासह सुरक्षा रक्षक श्री. सुजन पोवार, सागरी सुरक्षा रक्षक श्री. अमोल पिलणकर, श्री. अनिकेत पवार आणि श्री. भूषण करमरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या कारवाईचा सविस्तर अहवाल (प्रतिवेदन) दाखल केला आहे. यानंतर आता या प्रकरणाची रीतसर सुनावणी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या न्यायालयात पार पडणार आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने उचललेल्या या पावलामुळे अवैध मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त Read More »

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता. ३) कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार सौ. स्वप्ना यादव यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झाले, तर समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या राजश्रीताई पाटील, भागिरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, सहसचिव सौ. भारतीताई मुथ्था, संचालिका सौ. निलिमा बावणे, ॲड. अंजलीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. स्वप्ना यादव यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या प्रभावी आणि जबाबदार कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल Read More »

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ Read More »

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रत्नागिरी विभागाला तब्बल १०० बसेस मिळणार आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई येथे नुकतेच या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल होणार आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ३ बाय २ आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना अनेक प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ३ बाय २ आसन क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या बसेसमुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेची सुरुवात नागपूर येथून होणार असून प्रारंभी तेथे ५० बसेस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या बसेस लवकरच दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी” Read More »

मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही सेवा, त्याच दिवशी बंद पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.इतक्या चर्चेत असलेला हा प्रकल्प एवढ्या लवकर का बंद पडला?यामागची कारणं आता समोर येऊ लागली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,ही सेवा कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.मात्र, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली.फक्त प्रवासच नाही,तर बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग असल्याच्या तक्रारी समोर आल्या.त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत होता.याशिवाय,या बोटीत मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे.शौचालय, बसण्याची सोय, विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा या बाबतीतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.एकीकडे मोठा गाजावाजा…आणि दुसरीकडे अपुरी सेवा…यामुळे प्रवाशांचा अनुभव समाधानकारक ठरला नाही.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,या सेवेला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.दररोज ५० पेक्षाही कमी प्रवासी या सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच,प्रवाशांचा कमी प्रतिसाद,महागडे तिकीट दर,अपुर्‍या सुविधाआणि वाढती नाराजी…या सगळ्यांचा परिणाम म्हणूनमुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याचं चित्र दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की,कोकणासाठी महत्त्वाकांक्षी मानला गेलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार का?की ही सेवा फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार?याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद Read More »

sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संबंधित संशयित हा संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरूख येथील संगणक वर्ग आटोपून बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग सुरू केला. मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ संशयिताने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन त्याने अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेनंतर पालकांनी विद्यार्थिनींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत Read More »

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात

चिपळूण : पेठमाप परिसरात आज पहाटे साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे संभाव्य मोठे संकट टळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक श्री. प्रमोद बुरटे यांनी तत्काळ पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांना कळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री. कोवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणा घटनास्थळी धाडली आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असतानाच, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा अक्षरशः धावली. सुपरवायझर घडशी, ज्येष्ठ कर्मचारी खांबे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सलग १२ तास जीवाचे रान करत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. विशेष म्हणजे, संध्याकाळच्या नियोजित वेळेपूर्वीच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा त्रास टळला असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या संपूर्ण कारवाईत पाणीपुरवठा सभापती श्री. निहार कोवळे यांचे नेतृत्व ठळकपणे पुढे आले. तातडीचे निर्णय, प्रभावी समन्वय आणि कामावरील पकड यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली. त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठे संकट अवघ्या काही तासांत नियंत्रणात आणले गेले. घटनेनंतर शहरभरातून श्री. कोवळे आणि त्यांच्या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत असून, “अशाच तत्पर आणि जबाबदार कामाची अपेक्षा आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्य पाईपलाईन फुटली, तरीही पाणीपुरवठा अखंडित! निहार कोवळे यांच्या झटपट कारवाईने १२ तासांत संकटावर मात Read More »

nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधी निवळी ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर 18 चाकी गाडी बेदरकारपणे चालवून अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास घडली.सुधीर मुन्नालाल केवट (मुळ रा.अमिलीया सोनवर्षा ता.नयगडी मध्यप्रदेश सध्या रा.कळंबोली,नवी मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रमोद गणपत यमगर (29,रा.चितली खटाव जि.सातारा) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी संशयित चालक सुधीर केवट हा आपल्या ताब्यातील 18 चाकी गाडी (एमएच-46-सीएल-5981) घेउन निवळी ते जयगड असा जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता गाडी चालवल्याने अपघात झाला. या अपघातात गाडीचे आणि गाडीत असलेल्या फोर्थलिफ्ट (एमएच-43-बीवाय-5755) चेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल Read More »

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी : प्रतिनिधीमुलगा आणि सूनेचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला सुनेने शिवीगाळ व दमदाटी करत कपाळावर आणि हाताच्या मनगटावर कोयती मारुन दुखापत केली. ही घटना शुक्रवार 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा.सुमारास वेरवली-डाफळेवाडी लांजा येथे घडली.स्वाती भिकाजी पवार (रा.वेरवली डाफळेवाडी,लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सूनेचे नाव आहे. तिच्या विरोधात सासू सत्यवती सखाराम पवार (75,रा.वेरवली डाफळेवाडी,लांजा) यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार, या दोघ्ाी एकाच घरात विभक्त राहतात. शुक्रवारी सायंकाळी सत्यवती पवार यांची संशयित सून स्वाती आणि मुलगा यांच्यात मोठ-मोठ्याने भांडण सूरु होते. म्हणून त्यांना समजावण्यासाठी सत्यवती पवार आणि साक्षिदार बाळकृष्ण पवार हे दोघे गेले असता संशयित सुनेने त्यांनाच शिवीगाळ व दमदाटी करुन सासूला कोयतीने मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.

लांजा: भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्ध सासूवर सुनेचा कोयत्याने हल्ला; लांजा पोलिसांत गुन्हा दाखल Read More »

WhatsApp Image 2026 04 04 at 8.30.54 PM

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. प्रतीक संजय भंडारी (रा. नाशिक) हा आपल्या मित्रांसह XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. अपघातात कृष्णा आव्हाड, संदीप डेरिंगे व चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूणचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मदतकार्य केले.

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी Read More »