konkandhara.com

Editorial

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी सोमवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगरपालिकेत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक घेतली. या बैठकीत ठेकेदारांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार करून विविध समस्या व प्रश्न मांडले. नगराध्यक्षांनीही ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेत संवाद साधला. या वेळी बोलताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ म्हणाले की, चिपळूण शहराला आकार देण्याचे महत्त्वाचे काम ठेकेदार बंधू करत असतात. त्यामुळे सर्वांनी उत्तम नियोजन करून दर्जेदार कामे करावीत. चिपळूण शहर स्मार्ट सिटी बनवण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांचे सहकार्य आवश्यक आहे. या बैठकीला साठहून अधिक ठेकेदार उपस्थित होते. तसेच बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेवक योगेश पवार, मुख्याधिकारी संजय जाधव, बांधकाम विभागाचे श्री. डफळ, श्री. निंबाळकर, सचिन शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ठेकेदार सुरेश चिपळूणकर, सुरेश पवार, किसन चिपळूणकर व अभिजीत जाधव यांच्या वतीने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. सर्व ठेकेदारांनी नगर पालिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेत चिपळूण शहराच्या विकासासाठी दर्जेदार कामे करण्याची ग्वाही दिली.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा ठेकेदारांशी संवाद; दर्जेदार कामांवर भर Read More »

konkandhara 41

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी (९ मार्च) दुपारी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे चेसिस एका बाजूला तर लोखंडी सांगाडा सुमारे दीडशे फूटांहून अधिक खोल दरीत जाऊन पडला. दरम्यान, भोस्ते घाटातील ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या परिसराला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले आहे. या भागात वारंवार अपघात होत असल्याने अपघात रोखण्यासाठी घाटाच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.मात्र, तरीही या घाटात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात Read More »

khed-panchayat-samiti-chairman-dr-afia-palekar

खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर तर उपसभापतीपदी सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. खेड पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या निवडणुकीदरम्यान सर्व प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून कामकाज पार पाडण्यात आले. पिठासीन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सभापतीपदी डॉ. अफिया नजीब पालेकर आणि उपसभापतीपदी सुनील मोरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम यांनी डॉ. अफिया पालेकर आणि सुनील मोरे यांना त्यांच्या दालनात नेऊन अधिकृत खुर्चीत विराजमान करून पदग्रहणाचा सोहळा पार पाडला. यावेळी उपस्थितांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. अफिया पालेकर आणि उपसभापती सुनील मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

खेड पंचायत समिती सभापतीपदी डॉ. अफिया पालेकर, उपसभापतीपदी सुनील मोरे Read More »

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओमळी गावात समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करत त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम म्हणाल्या की, महिलांनी अनेक अडचणींवर मात करत प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र कष्टकरी महिलांना रोजच्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिल्यास त्या समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. स्त्री सन्मान हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधून समाजात निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजाताई निकम यांच्या संकल्पनेतून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा वावरे, सीआरपी संध्या सुर्वे, अरुणा घाडगे, वैष्णवी चव्हाण तसेच ज्ञानदीप वाचनालयाच्या सचिव सौ. बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे कार्य समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात सन्मानित महिलांनीही आपले अनुभव व्यक्त केले. गावातील बालकांचे पोषण, आरोग्य आणि संगोपन यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने परिश्रम घेत असतात. त्यांच्या या कार्यामुळे समाजाच्या आरोग्यदायी भवितव्याला बळ मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ओमळीत अंगणवाडी सेविका व पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचा सन्मान | महिला दिन उपक्रम Read More »

अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रफुल्ल बाईत यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा होताच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. या निवडीनंतर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर पंचायत समितीवर महायुतीची एकहाती सत्ता आल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि सभापतीपदासाठी शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेदरम्यान या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरा कोणताही अर्ज दाखल न झाल्याने शर्वरी वेल्ये यांची सभापतीपदी तर प्रफुल्ल बाईत यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राजेश पत्याणे, प्रमोद पवार, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, रोहन बने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम, वैभव पवार, राजन कापडी, संजय कदम, राजेंद्र सुर्वे, हेमंत शिंदे, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, दिलीप बोथले, नितीन भोसले, प्रफुल्ल भुवड, यशवंत गोपाळ, पंकज पुसाळकर, पप्पू नाखरेकर, बापू शिंदे, मंगेश दळवी, प्रसाद सावंत, सचिन मांगले, योगेश शिंदे आदींसह पंचायत समितीचे सदस्य, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल पंडित, राजेंद्र महाडिक, प्रमोद अधटराव व पूजा निकम यांनी नूतन सभापती व उपसभापतींना शुभेच्छा देत संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. नूतन सभापती शर्वरी वेल्ये आणि उपसभापती प्रफुल्ल बाईत यांनीही वरिष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर दोघांनाही सभागृहात त्यांच्या पदाच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले.

संगमेश्वर पंचायत समिती सभापतीपदी शर्वरी वेल्ये, उपसभापतीपदी प्रफुल्ल बाईत बिनविरोध अनेक वर्षांनंतर राष्ट्रवादीला उपसभापतीपदाचा मान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह Read More »

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर १४ जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापनेत सहभाग घेतला आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले. नवनिर्वाचित सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी सूर्यकांत खेतले, उपसभापतीपदी संदेश आयरे बिनविरोध

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर १४ जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापनेत सहभाग घेतला आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले.नवनिर्वाचित सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी सूर्यकांत खेतले, उपसभापतीपदी संदेश आयरे बिनविरोध Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर; उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध

प्रतिनिधी : कोकणधारा गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंडकारुळ गावचे सुपुत्र असलेले प्रणव पोळेकर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या सभापतीपदाच्या निवडीने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजपचे निलेश सुर्वे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने महायुतीची ताकद पंचायत समितीत अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. गुहागर पंचायत समितीत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असून शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विजयानंतर पोळेकर आणि सुर्वे यांनी अल्पावधीतच आपली कार्यक्षमता, नेतृत्वगुण आणि जनसंपर्क यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नूतन सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्यावर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर; उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध Read More »

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

प्रतिनिधी : कोकणधारा दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे येथील पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्या सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत होती. महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर या दोघींमधील कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पार्वती गवस यांचे नाव पुढे आले असून त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या निवडीकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाले आहेत

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस Read More »

mumbai-goa-highway-three-toll-plaza-issue

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला

प्रतिनिधी : कोकणधारा माणगाव : मुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना प्रवाशांवर तीन टोल नाक्यांचा भार टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे जोडरस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला असून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. १६ वर्षांपासून रखडलेले काम मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी तसेच ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांनंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे. नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे सुरूच आहेत, तर माणगाव आणि इंदापूर बायपासही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत टोल वसुलीची तयारी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. टोल दर अद्याप जाहीर नाहीत टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यास वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावांकडे जाणारे रस्ते निकृष्ट पळस्पे ते इंदापूर या टप्प्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र हे जोडरस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी ब्लॉक टाकून तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधा अपुऱ्या, नागरिकांचा सवाल महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुलीची घाई का केली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारणी करावी तसेच सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण महामार्गावर टोल आकारणीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. तसेच याविरोधात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला Read More »

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »