konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात
Image

भोस्ते घाटात कंटेनर दरीत कोसळला; चालक गंभीर जखमी, मुंबई–गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर भीषण अपघात

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी (९ मार्च) दुपारी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सोमवार दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे चेसिस एका बाजूला तर लोखंडी सांगाडा सुमारे दीडशे फूटांहून अधिक खोल दरीत जाऊन पडला.

दरम्यान, भोस्ते घाटातील ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या परिसराला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले आहे. या भागात वारंवार अपघात होत असल्याने अपघात रोखण्यासाठी घाटाच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.
मात्र, तरीही या घाटात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान