konkandhara.com

कोकणची बातमी

चिपळूण पाग परिसरात उड्डाणपूल; १०७.७८ कोटींच्या प्रकल्पासाठी नारायण राणे पुढाकार

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. वाढती लोकसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि शहरांतर्गत वाहतुकीचा ताण लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १०७ कोटी ७८ लाख रुपयांच्या वाढीव उड्डाणपुलाचा (Elevated Structure) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. तहसील कार्यालय ते ‘पाग’ या दरम्यान उड्डाणपुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या भागात एसटी बसेस व अवजड वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात घडले असून, वाहतूक कोंडीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १८ जून २०२५ रोजी १०७.७८ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार केला. त्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडून हा प्रस्ताव अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, वार्षिक आराखड्यात या कामाचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन खासदार नारायण राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चिपळूणमधील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची गंभीरता त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहतूक यांचे विभाजन होऊन अपघातांमध्ये मोठी घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही पाठपुरावा केला आहे. खासदार राणे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. साखळी क्रमांक ५१+५५० ते ५२+६२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या या उड्डाणपुलामुळे चिपळूणच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.सध्या या प्रस्तावावर पुढील प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित असून, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम, १०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार Read More »

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा गौरव रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी, दि. २८ : दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या मूल्यमापनात २०० पैकी १४४.२५ गुण मिळवत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात पाचवे स्थान मिळविले. बगाटे यांनी ‘मिशन जीवन’, ‘रेड्स ॲप’, ‘मिशन गती’, ‘रत्नसेतू चॅटबॉट’सह २४ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस यंत्रणा अधिक तंत्रस्नेही व लोकाभिमुख केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान केला.

ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस अधीक्षकनितीन बगाटे यांचा गौरव Read More »

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे, दि. २७ मार्च : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून, नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत या शाळांचे संचालन केले जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख साजिद चिकटे यांच्यासह प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के आणि सौ. श्रुती जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी Read More »

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा. श्री. अनिलशेठ दाभोळकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते बुधवार दि. १ एप्रिल २०२६ या कालावधीत खेर्डी बाजारपेठेतील “कै. अजित दादा पवार क्रीडानगरी” येथे भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या माध्यमातून गेल्या सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केले जात असून, यंदाचे हे चौथे पर्व ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे खेर्डी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जयंद्रथशेठ खताते, अनिलशेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, प्रकाश शेठ साळवी यांच्यासह खेर्डीतील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी खेळविण्यात येणार असून, याच दिवशी प्रमुख पाहुणे, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अनिलशेठ दाभोळकर यांचा ७० वा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १६ नामांकित संघ सहभागी होणार असून, स्पर्धा रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेर्डी तसेच संपूर्ण चिपळूण तालुक्यातील कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा थरार अनुभवावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार Read More »

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख, दि. २७ मार्च : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीधर जाधव हे मुंबई महानगर पालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती होत. तसेच ते युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांचे वडील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडीक यांचे बंधू होत. त्यांचे पार्थिव आज दुपारी १ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ओमकार वेदा, ग. द. आंबेकर मार्ग, राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयाजवळ, भोईवाडा, मुंबई येथे ठेवण्यात येणार आहे. श्रीधर (अण्णा) जाधव यांच्या निधनाबद्दल संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन Read More »

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी - मंत्री नितेश राणे मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे Read More »

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका येथे पत्रकारांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे सदर प्रकरणातील सर्व दोषींवर सखोल, निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दि. २५ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूणसारख्या सुसंस्कृत शहरात अशा घटना घडणे अत्यंत अशोभनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवरील मारहाणीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्याचेही यात नमूद करण्यात आले असून, या प्रकरणातील दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. भविष्यात चिपळूणमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याचे धाडस कोणालाही होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर आणि कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या वेळी शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर आदी उपस्थित होते. पत्रकारांवरील या घटनेनंतर विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

पत्रकार मारहाणीचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे Read More »

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण, दि. २५ : वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण, वनव्यवस्थापन आणि वनसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मानाच्या राज्यस्तरीय पदकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने ठसा उमटवला आहे. महसूल व वन विभागाने दि. २५ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, रत्नागिरी येथे कार्यरत विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा शोभा नरेंद्र देसाई यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. श्रीमती देसाई यांच्या या सन्मानामुळे रत्नागिरी वनविभागात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय गौरवात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच नव्हे, तर मैदानी पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला आहे. रत्नागिरी वनवृत्तातील वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. तसेच वनसंरक्षणाच्या कामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक जाहीर करण्यात आले आहे. या पदकांसाठी निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात आली. अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल, तांत्रिक कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष कामगिरीची सखोल छाननी करून अंतिम निवड केली. महाराष्ट्र शासनाने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर केली आहेत. वन/वन्यजीव संरक्षण, व्यवस्थापन, वनविस्तार आदी सहा विविध कार्यप्रकारांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील या मानकरी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाची नोंद सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. या सन्मानामुळे वनसेवेत कार्यरत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

रत्नागिरी वनविभागाचा राज्यात डंका; विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाईंसह तिघांना सुवर्ण पदक Read More »

chiplun-balanatya-training-camp-akhil-bharatiya-natya-parishad

चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने यावर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दि. १७ ते २६ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून, त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे दोन वर्षांपूर्वी पुनर्जीवन झाल्यानंतर शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली आहे. बालनाट्य शिबिर, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांची कार्यशाळा, महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’, ‘आनंदयात्री पुल’ अशा एक-दोन नव्हे तर एकूण २८ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दरवर्षी बालनाट्य शिबिर आयोजित करण्याची परंपराही जपली जात आहे.या शिबिराच्या पहिल्या वर्षी सुरेश गायधनी, तर दुसऱ्या वर्षी अभिजीत झुंजारराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. यंदा पुण्यातील प्रा. रश्मी नंदकुमार देव या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रा. रश्मी देव या एमईएसओ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, पुणे येथे नाट्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एम.ए. फिलॉसॉफी, एम.ए. इंडोलॉजी, एम.ए. नाट्यशास्त्र, तसेच हेरिटेज मॅनेजमेंट डिप्लोमा आणि सर्टिफाइड योगा इन्स्ट्रक्टर अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.त्या गेली २० वर्षे मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, तसेच मीडिया क्षेत्रात अभिनेत्री, दिग्दर्शिका, माहितीपट निर्माती आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. देशाची कला, इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘गाभारा’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांत भूमिका साकारल्या असून, ३५ हून अधिक माहितीपटांची संकल्पना, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे. शिबिरातून तयार करण्यात आलेले बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर करण्यात येणार आहे. वय वर्षे ७ ते १७ या वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या खजिनदार ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७), दिलीप आंब्रे ( 8291089302) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

चिपळूणमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन Read More »