konkandhara.com

Editorial

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण-तिवरे एस.टी. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाने चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली. या प्रकारामुळे काही काळ बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास (क्र. एमएच २० बीएल २४३७) ही एसटी बस तिवरे गावाकडे जात असताना प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंत असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. यावरून आरोपीने संतापून चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) व वाहकासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने चालकाला मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या चेहऱ्यावर नख लागून दुखापत झाली असून त्यांचा शर्टही फाटला. तसेच वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील सुमारे ८०० रुपये गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा (रजिस्टर नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण Read More »

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर दिलासा देणारा निर्णय झाला असून पूर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहादुरशेख पुलापासून वांगडे मोहल्ला पर्यंतचा हा भाग नदीकाठावर वसलेला असून येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. विशेषतः २२ व २३ जुलै २०२१ च्या भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच नदीच्या पाण्याच्या वेगामुळे काठालगतची जमीन खचत असल्याने घरांना सतत धोका निर्माण झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून क्षेत्रीय कार्यालयाच्या पाहणीनंतर तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत अप्पर मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, मुख्य अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता गणेश सलगर व त्यांच्या तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. दरम्यान, हा केवळ पहिला टप्पा असून पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांसाठीही लवकरच मंजुरी मिळविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या कामामुळे वाशिष्ठी काठावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री उदय सामंत तसेच संबंधित अधिकारी यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले आहेत. तसेच दिवंगत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले आहे.

“पूरमुक्त चिपळूणकडे मोठे पाऊल; वांगडे मोहल्ल्यासाठी २४.९९ कोटींची संरक्षण भिंत Read More »

dr-sunita-chavan-ratnagiri-gynecologist-death

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ तसेच स्वस्तिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. चव्हाण यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि वैद्यकीय कौशल्याने असंख्य महिलांना आरोग्यसेवा दिली. स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी जिल्ह्यात मोठे योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल सर्व स्तरांतून घेतली जात होती. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत माळनाका येथील स्वस्तिक बंगला येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघून चर्मालय स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात डॉ. नितीन रमेश चव्हाण यांच्यासह शोकाकुल परिवार आहे.

रत्नागिरीतील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनिता चव्हाण यांचे निधन Read More »

ratnagiri-zp-committee-chairman-election-25-march-names-discussion

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला; संभाव्य नावांची जोरदार चर्चा

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही महत्त्वपूर्ण निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनात विषय समित्यांचे सभापती पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धोरणात्मक निर्णय, योजना अंमलबजावणी आणि विभागनिहाय कामकाज यामध्ये या पदांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी काही अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चिपळूणच्या मयुरी शिर्के यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपद मिळण्याचे संकेत असून महिलांच्या प्रश्नांवरील त्यांची जाण आणि प्रशासकीय अनुभव यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते.रत्नागिरीचे प्रकाश रसाळ यांच्याकडे समाज कल्याण समितीची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंचित घटकांसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, अशी चर्चा आहे. राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश कुवळेकर यांच्या नावाचा विचार शिक्षण व अर्थ समितीसाठी केला जात असल्याचे समजते. शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि अर्थसंकल्पीय नियोजनात त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, असा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.गुहागर तालुक्यातील महेश नाटेकर यांना कृषी समिती सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. कोकणातील शेती व बागायतदारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ग्रामीण भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीसाठी त्यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही सर्व नावे सध्या चर्चेच्या टप्प्यात असून २५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राजकीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेता या नावांना पसंती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या निवडीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून आगामी काळात विकासकामांच्या गतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला; संभाव्य नावांची जोरदार चर्चा Read More »

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा देवरूख (संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचा कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते; मात्र बुधवारी रात्री उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तेजस्विनी ही वांझोळे गावातून घडलेली एक आघाडीची खेळाडू होती. मागील काही वर्षांत वांझोळे गावाने खो-खो क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या गावातून घडले आहेत. त्या परंपरेतील तेजस्विनी ही एक उज्ज्वल नाव होती. अवघ्या १२ व्या वर्षी भुवनेश्वर (ओडिशा) येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. त्या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जि.प. शाळेतील सर्वात कमी वयातील राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही तिने विशेष नावलौकिक मिळवला होता. उंचीने लहान असली तरी खेळातील चपळता, वेग आणि जिद्द यामुळे ती मैदानावर उठून दिसत असे. अनेक सामने तिने आपल्या संघासाठी जिंकून दिले होते. मात्र खो-खोच्या मैदानावर जिद्दीने लढणारी ही खेळाडू आयुष्याचा सामना हरली, ही बाब सर्वांना वेदना देणारी ठरत आहे. तिच्या अकाली निधनामुळे सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वांझोळे गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी खो-खो परिवाराचीही ही मोठी हानी मानली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन Read More »

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. बौद्धवाडी) हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित इसम घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. झडतीदरम्यान पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ₹७०,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४/२०२६ नोंद करून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. बौद्धवाडी) हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित इसम घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. झडतीदरम्यान पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ₹७०,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४/२०२६ नोंद करून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक Read More »

karachi-pattern-dress-controversy-chiplun-police-complaint

‘कराची पॅटर्न’ ड्रेसवरून चिपळूणमध्ये वाद; परस्पर तक्रारी दाखल

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील एका कपड्यांच्या दुकानात विक्रीस ठेवलेल्या ‘कराची पॅटर्न’ महिलांच्या ड्रेसवरून चिपळूणमध्ये वाद निर्माण झाला आहे. या ड्रेसच्या मार्केटिंगची रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी संबंधित दुकानात जाऊन दुकानदाराला जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी या ड्रेसविरोधात आक्षेप घेत दुकानदाराशी चर्चा केली, मात्र परिस्थिती चिघळल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी चिपळूण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

‘कराची पॅटर्न’ ड्रेसवरून चिपळूणमध्ये वाद; परस्पर तक्रारी दाखल Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी : कोकणधारा खेड (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट जगबुडी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली. या अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून घसरत थेट पुलाच्या कठड्यावर चढली. जर ही कार कठड्यावर अडकली नसती, तर ती थेट सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल जगबुडी नदीत कोसळली असती. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.अपघाताचा आवाज ऐकून इतर वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही काळासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाढता वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला Read More »

furus-accident-khed-dapoli-highway-father-death-daughter-injured

फुरूस येथे भीषण अपघात; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा खेड (प्रतिनिधी): खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ॲक्टिव्हा दुचाकीवरून प्रवास करत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक अत्यंत भीषण असल्याने खामकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत खेड-दापोली महामार्गावर रस्ता रोको केला. सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी एका संशयित वाहनाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

फुरूस येथे भीषण अपघात; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी Read More »

पाग उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; ८ दिवसांत सुधारणा आदेश

पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी बुधवारी सायंकाळी पाग येथील उद्यानाला भेट देत तेथील दुरवस्थेबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. उद्यानातील स्वच्छतेचा अभाव, बंद असलेले स्वच्छतागृह, वाढलेले गवत आणि अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी नगराध्यक्षांनी उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्याच्या, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच उद्यान सकाळी व सायंकाळी नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. “मी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करा, आठ दिवसांनंतर पुन्हा पाहणी करणार,” असा इशाराही त्यांनी दिला. भेटीदरम्यान उद्यानात स्वच्छता करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही स्वच्छता नेहमीच असते का, असा प्रश्न विचारला असता नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच स्वच्छता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. उद्यानात विजेची सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या. वीज उपलब्ध झाल्यानंतर सायंकाळी होणारे गैरप्रकार रोखता येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पेव्हर ब्लॉक दुरुस्त करण्याचे, उद्यानाची दोन्ही गेट्स सुरू ठेवण्याचे व इतर अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करण्याचे निर्देश दिले. स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देताना उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर यांनाही दुरवस्थेबाबत सुनावले. आरोग्य सभापती शुभम पिसे यांनीही आरोग्य व उद्यान विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या. या पाहणीवेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका शितल रानडे, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, माजी नगरसेविका सई चव्हाण, तसेच विपुल कांबळी, नयन चव्हाण, संदेश गोरीवले, गणेश किंजळकर, प्रसाद शिंदे, सोहम चव्हाण, अमोल तटकरी, प्रितेश सुतार, हेमंत केळसकर, धिरज तांबडे, प्रथमेश कांबळी, अथर्व चव्हाण आदी उपस्थित होते.

पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश Read More »