konkandhara.com

कोकणची बातमी

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स संपला

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स अखेर संपला

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला असून, पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून, सर्व नियुक्त्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या निवडीची प्रक्रिया बुधवार, दि. २५ मार्च रोजी पार पडणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या कामकाजात विषय समित्यांचे महत्त्व अधोरेखित मानले जाते. विविध योजनांची अंमलबजावणी, विभागनिहाय नियोजन आणि निर्णयप्रक्रियेत सभापतींची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.जाहीर करण्यात आलेल्या नावांनुसार, विलास चाळके यांची उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य) म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच मयुरी मिलिंद शिर्के (महिला व बालकल्याण), महेश राघू नाटेकर (कृषी व पशुसंवर्धन), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे (समाजकल्याण) आणि नंदकुमार नारायण मुरकर (अर्थ व शिक्षण) यांची सभापतीपदी निवड निश्चित करण्यात आली आहे. पक्षांतर्गत शिस्त राखत सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने ‘सव्वा वर्षांचा’ कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार ही नाव निश्चिती करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. आगामी काळात ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी नव्याने निवड झालेल्या सभापतींवर असणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतींची नावे जाहीर; सस्पेन्स अखेर संपला Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांची मंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील विविध अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांनी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी मंगळवारी मुंबईत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी मंत्री पाटील यांनी प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या.राज्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातही कामे सुरू आहेत. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी, अपुरी साधनसामग्री आणि ठेकेदारांची रखडलेली बिले यामुळे कामांच्या गतीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सावर्डे, सावर्डे खुर्द व कासारवाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी एकूण २८ हजार मीटर अतिरिक्त पाईपलाईन आवश्यक आहे. त्यापैकी १५ हजार मीटर काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित १३ हजार मीटर पाईप उपलब्ध नसल्याने योजना अपूर्ण आहे. हे पाईप ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप कार्यवाही झालेली नाही.तसेच ओवळी-कळकवणे-वालोटी योजनेत मुख्य स्त्रोत व पाणी आरक्षण मंजूर असूनही जोडणी व इतर कामे प्रलंबित आहेत. यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी निकम यांनी केली.बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. चौकट :योजना मार्गी लावण्यासाठी तातडीचे निर्णय आवश्यक – निकमकोकणातील डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निकम यांनी नमूद केले. जिल्ह्यातील ३७८ योजनांपैकी केवळ ४९ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून ७५ ते १०० टक्के प्रगतीतील योजनांना प्राधान्याने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सुमारे ९३ कोटी रुपयांची ठेकेदारांची प्रलंबित बिले तातडीने देऊन कामांना गती द्यावी, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.

चिपळूण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या अडचणींबाबत आमदार शेखर निकम यांची मंत्र्यांकडे मागणी Read More »

dadar-ratnagiri-passenger-train-mns-warning-stop-trains

दादर-रत्नागिरी पॅसेंजर १५ दिवसांत सुरू करा; अन्यथा ट्रेन रोखण्याचा मनसेचा इशारा

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी धावणारी ही पॅसेंजर ट्रेन सध्या फक्त दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवा स्थानकापर्यंत जाऊन ट्रेन पकडावी लागत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, हे मनसेला मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास “मनसे स्टाईल” आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी जमीन दिली, मात्र आज त्याच कोकणवासीयांची गैरसोय होत असल्याची खंत व्यक्त करत, हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी मनसेने केली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर १५ दिवसांत सुरू करा; अन्यथा ट्रेन रोखण्याचा मनसेचा इशारा Read More »

konkandhara 20 2

काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून शहरातील काविळतळी येथे पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन नुकतेच पार पडले. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सर्वसामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. संदीप भिसे यांनी घेतलेली ही पुढाकार अनुकरणीय असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा, सहकार्य आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. पाणपोईसारख्या उपक्रमातूनही मोठा सामाजिक संदेश दिला जातो, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, नगरसेवक संदीप भिसे आगामी काळातही याच सामाजिक बांधिलकीतून काम करत राहतील. या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, नगरसेविका वैशाली निमकर, हर्षाली पवार, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, तसेच अभिनव भुरण, सपना भिसे, कुणाल आंबेकर, शक्तीकुमार चव्हाण, प्रवीण भिसे, सचिन शिंदे, अमोल भिसे, वेद सुर्वे, यश खंडजोडे, सुरेश भिसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पाणपोईमुळे परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

काविळतळी येथे नगरसेवक संदीप भिसे यांच्या पुढाकारातून पाणपोईचे उद्घाटन Read More »

रत्नागिरीत 114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील 114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू राहणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली.

114 ग्रामपंचायतींतील 174 रिक्त पदांसाठी 28 एप्रिलला निवडणूक Read More »

डिझेल दरवाढीने मच्छिमार अडचणीत; केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी – नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, Read More »

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधला आहे. गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष Read More »

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगावजवळ असलेल्या ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांच्या मालकीचे हे हॉटेल असून रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिली, मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केल्याने संपूर्ण हॉटेल भस्मसात झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आग लागण्यामागील कारणाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित मालकांनी ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अवैधरित्या प्रवेश करून मद्यप्राशन करणाऱ्यांना पकडल्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधितांकडून धमकी व मारहाणीचा प्रयत्नही झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या आगीचा त्या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नांदगावजवळ ‘हॉटेल पिकनिक पॉईंट’ला मध्यरात्री आग; जाळपोळीचा संशय Read More »

konkandhara 59

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील CETP (सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याची घटना घडली आहे. या सांडपाण्यात PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा अंश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदी ग्रामस्थांनी हा टँकर अडवला. संबंधित टँकर CETP प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी आणण्यात आला होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापनाने तपासणीनंतर हे सांडपाणी स्वीकारण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी टँकर पकडूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित असताना पंचनामा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक रसायन मानले जाते. त्यामुळे या सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आहे.यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये अशा प्रकारचे रेसिड्यू सोडण्यास विरोध दर्शवला होता. मात्र प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या घटनेची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुना तपासणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, तसेच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, घातक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. PFAS सारख्या घातक रसायनांबाबत स्पष्ट व कठोर धोरण आखून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी Read More »

konkandhara 58

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर प्रत्यय देणारा एकात्मतेचा संदेश ईद-उल-फितरच्या निमित्ताने चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मापारी मोहल्ला मस्जिद (प्रभाग क्र. ४) येथे ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमातून सणांच्या माध्यमातून समाजात बंधुभाव, प्रेम, एकात्मता आणि सौहार्द वाढवण्याचा संदेश देण्यात आला. “ईदचा सण केवळ धार्मिक उत्सव नसून समाजाला एकत्र आणणारा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.या प्रसंगी नगरसेवक अजय भालेकर, वैशाली कदम, संजय गोताड, युवसेना चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्यासह प्रसाद म्हापुस्कर, लावेश म्हापुस्कर, सुरेश पाथरे, विलास चिपळूणकर, संदिप मनोरकर, प्रकाश साडविलकर, परिमल साडविलकर, गणेश गांधी, सचिन लकेश्री आणि पंकज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

ईद निमित्त चिपळूणमध्ये सौहार्दाचा संदेश; मुस्लिम बांधवांना शुभेच्छा Read More »