konkandhara.com

राजकारण

Web Banner 2

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ!

सदा सरवणकर यांचे वादग्रस्त वक्तव्य | आमदार निधी वाटपावरून माहिममध्ये राजकीय खळबळ मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात” – माहिममधून नवा वाद पेटला मुंबई :माहिम मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सदा सरवणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले – “आजचा आमदार फक्त 2 कोटी रुपयांचा निधी घेतो. पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या मागे ठामपणे उभे आहेत.” त्यांनी पुढे बोलताना दावा केला की, “काम करणाऱ्यांना पराभव पत्करावा लागतो, पण काम न करणारे जाती-पातीच्या आधारावर जिंकतात. माझा पिंड हा कामाचा असल्यामुळे मी सतत विविध कामांच्या उद्घाटनासाठी दिसतो.” 🔥 विरोधकांचा पलटवार सरवणकर यांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. माहिमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी पलटवार करत विचारले – “जनतेने पराभूत केलेल्या माजी आमदाराला 20 कोटी निधी देणे हा मतदारांचा अपमान आहे. निवडून दिलेल्या आमदारांना निधी न देणे हा सरळसरळ अन्याय आहे. आतापर्यंत त्यांना 500 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला. हा पैसा गेला कुठे?” सावंत यांनी जाहीर केले की, ते विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे औपचारिक तक्रार करणार आहेत. तर ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले –“सत्ताधाऱ्यांना मुजोरी चढली आहे. आमदार निधी वाटपाची पद्धत चुकीची आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडून व्हावी.” 📌 पार्श्वभूमी आमदार निधी हा स्थानिक विकासासाठी देण्यात येणारा निधी असून, त्याचा वापर मतदारसंघातील सार्वजनिक कामांसाठी करणे अपेक्षित असते. पण अनेकदा या निधीचे वाटप सत्ताधारी- विरोधी गटातील भेदभावावर अवलंबून असल्याचे आरोप होत असतात. सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटपातील पारदर्शकता व न्याय्यतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे माहिम मतदारसंघासोबतच संपूर्ण राज्यातील आमदार निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधी पक्ष आता या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ! Read More »

Web Banner 16

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ‘अर्धे पाकिस्तानी’ अशी जहरी टीका केली होती. राऊतांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी अत्यंत संतप्त भाषेत राऊतांवर घणाघाती हल्ला चढवत म्हटलं की, “संजय राऊतांचा बापच दाऊद इब्राहिम असल्याने ते अशी भाषा वापरतात. अजित पवारांवर बोलायची राऊतांची लायकीच नाही. त्यांच्या जीभेला हासडले पाहिजे.” 👉 नेमकं काय म्हणाले राऊत?पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याला विरोध करताना राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त आहे, ते अर्धे पाकिस्तानी आहेत. जर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ही भाषा असेल, तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची नाही,” असे ते म्हणाले होते. 👉 अजित पवारांचं स्पष्टीकरणखेळाकडे खेळाच्या नजरेतून पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तसेच, विरोधक फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मुद्दाम भावनिक विषयांचा वापर करतात, अशी टीकाही त्यांनी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.27 AM

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.26 AM

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.25 AM

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्यमैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. राजेशाही परंपरेचं आजही पालनआजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.29.08 AM

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.” 👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले. “ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.20.39 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.17.03 AM

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे. 🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.14.49 AM

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 8.56.23 AM

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा

मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली. संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी उपस्थित या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा Read More »