konkandhara.com

Image

टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर

चतुरंग विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन

चिपळूण : देशहिताच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गोपनीयता हीच सर्वात मोठी ताकद असते. अणुचाचणीसारख्या मोहिमांमध्ये सहभागी होताना व्यक्तींचे व्यक्तिगत मोठेपण, पद, अहंकार हे सर्व गळून पडते आणि देशभक्ती हेच एकमेव ध्येय उरते. जेव्हा ध्येय स्पष्ट असते, तेव्हा छोटे-मोठे मतभेद, वाद आणि अडथळे आपोआप बाजूला पडतात; अन्यथा अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी शक्यच झाली नसती, असे ठाम प्रतिपादन पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलन’ शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे उत्साहात सुरू आहे. या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत ज्ञानप्रबोधिनीचे आदित्य शिंदे यांनी घेतली. ‘पोखरण अणुचाचणी’ या विषयावर केंद्रित या संवादातून विद्यार्थ्यांना विज्ञान, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्व यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

भारताच्या अणुचाचण्यांबाबत सविस्तर बोलताना डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले की, अणुचाचणी करणे म्हणजे केवळ वैज्ञानिक प्रयोग नव्हे, तर अत्यंत संवेदनशील, उच्चस्तरीय आणि बहुआयामी आव्हानांचा सामना करणारी राष्ट्रीय मोहीम असते. पोखरण अणुचाचणी दरम्यान काम करताना प्रत्येक टप्प्यावर अचूकता, गोपनीयता आणि समन्वय यांचा कस लागला.

विशेषतः अमेरिकन गुप्तहेर उपग्रहांचे सतत लक्ष भारतावर असल्यामुळे काम अधिकच कठीण झाले होते. उपग्रह ठराविक वेळेला त्या परिसरावरून जात असत. त्यामुळे त्या वेळेत कोणताही संशय येऊ नये, यासाठी परिसरातील सर्व हालचाली पूर्णपणे ‘नॉर्मल’ ठेवाव्या लागत. एक दिवस आधी जशी परिस्थिती होती, तशीच दुसऱ्या दिवशीही दिसावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येत असे.

राजस्थानमधील प्रचंड उष्णतेत, सुमारे ५१ अंश सेल्सिअस तापमानात, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी काम केले. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शिस्त, संयम आणि राष्ट्रनिष्ठा यांच्या बळावर ही मोहीम यशस्वी झाली, असे त्यांनी नमूद केले.

देशाच्या विकासासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वीज निर्मिती, औद्योगिक प्रगती आणि तंत्रज्ञान विकासासाठी अणुक्षमता असणे ही काळाची गरज आहे. आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संवादादरम्यान डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबतचा एक प्रेरणादायी अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू असताना ते पाहणीसाठी गेले असता, त्यांना वाटले की प्रकल्पप्रमुख म्हणून कलाम सहज ओळखू येतील. मात्र ते इतर सहकाऱ्यांमध्ये पूर्णपणे मिसळून काम करत होते. शेवटी माझ्या सहकाऱ्याला विचारल्यावरच कलाम कोण आहेत, हे लक्षात आले. यावरून त्यांनी एक महत्त्वाचा धडा अधोरेखित केला, खरा नेता तोच, जो स्वतःला वेगळा दाखवत नाही, तर टीमचा एक भाग बनतो. अशा नेतृत्वातूनच मोठ्या मोहिमा यशस्वी होतात.

तरुण पिढीला मार्गदर्शन करताना डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

‘वर्क फ्रॉम होऊ शकते, तर वर्क फ्रॉम व्हिलेज का नाही?’ असा विचारप्रवर्तक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातही संधी निर्माण केल्यास शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल आणि गावांचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादिका शुभदा जोशी, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर , विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी प्रभावीपणे केले.

छाया: सचिन शेठ

Releated Posts

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची जोरदार रणनीती बैठक; “पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार” दोडामार्ग | भूषण सावंत :दोडामार्ग…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी

चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्ग विद्यार्थी संमेलनाचा उत्साहात शुभारंभ चिपळूण : ‘तुला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा-देवरुख मार्गावर आज शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्याने चौदा…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज रत्नागिरी शहराच्या दौऱ्यावर आले. त्यांनी रत्नागिरी शहरात…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी
साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत
“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”
अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.
तुरुंगाची भीती की सत्तेची ओढ? आम आदमीपासून भाजपपर्यंतचा प्रवास
कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.