konkandhara.com

महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना Read More »

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे. 🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा Read More »

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ Read More »

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा

मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली. संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी उपस्थित या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा Read More »

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे

मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसऱ्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत तुमाने यांना खोचक टोला लगावला आहे. राऊतांचा हल्लाबोल संजय राऊत म्हणाले,“हे कोण बोलतंय? ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देता? ही त्यांची निराशा आहे. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध आणि निष्ठावंत आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते गेले. आता उरलेले हे खरी शिवसेना आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.” “तुमचं नशीब फुटलंय” राऊत पुढे म्हणाले की,“ज्यांनी हे भाष्य केले ते पूर्वी शिवसेनेचे खासदार होते. आमच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांचा स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणलं. आता ते शिवसेना फुटणार असल्याचं सांगत आहेत. तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा.” राऊत यांनी असंही म्हटलं की भविष्यात शिंदे गटाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे Read More »

भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा निवृत्त; २५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटभारतासाठी 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामने; आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला शेवटचा सामना

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत २५ वर्षांच्या प्रवासाचा शेवट करत असल्याचं त्याने म्हटलं. मिश्रा भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळला. कसोटीत 76, वनडेत 64 आणि टी-20 मध्ये 16 बळी घेतले. निवृत्तीची घोषणा करताना मिश्रा काय म्हणाला? “आज, 25 वर्षांनंतर, मी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. हा खेळ माझे पहिले प्रेम, माझा शिक्षक आणि आनंदाचा सर्वात मोठा स्रोत आहे. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, प्रशिक्षक, सहकारी आणि चाहत्यांचे आभार. क्रिकेटने मला सर्व काही दिलं आणि आता या खेळाला काहीतरी परत देण्यास उत्सुक आहे.” — अमित मिश्रा अमित मिश्राची कारकीर्द पदार्पण: 2003 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत. कसोटी पदार्पण: 2008, मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध; पहिल्याच सामन्यात 5 बळी. विशेष कामगिरी: 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 18 बळी, जवागल श्रीनाथच्या विक्रमाशी बरोबरी. टी-20 विश्वचषक 2014: 10 बळी घेत भारताला मदत. आयपीएल: अनेक संघांसाठी खेळला. शेवटचा सामना IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध. मागील आठवड्यात तिनंनी निवृत्ती जाहीर केली 27 ऑगस्ट 2025 – रवीचंद्रन अश्विन, आयपीएलमधून निवृत्ती 2 सप्टेंबर 2025 – आसिफ अली, पाकिस्तानकडून सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती 4 सप्टेंबर 2025 – अमित मिश्रा, भारतीय क्रिकेटपटू (सर्व फॉरमॅट)

भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा निवृत्त; २५ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटभारतासाठी 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामने; आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला शेवटचा सामना Read More »

Hockey Asia Cup 2025: भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत चौथ्यांदा आशिया कप जिंकला

दिलप्रीत सिंहचा डबल स्ट्राईक; सुखजीत व अमित रोहिदासचे गोल; 2013 च्या फायनलमधील पराभवाचा बदला नवी दिल्ली | भारतीय हॉकी संघानं दमदार खेळ करत दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत आशिया कपवर चौथ्यांदा कब्जा केला. भारतासाठी दिलप्रीत सिंहनं दोन गोल केले, तर सुखजीत सिंह आणि अमित रोहिदासनं प्रत्येकी एक गोल नोंदवला. या विजयासह भारतानं 2013 मध्ये कोरियाविरुद्ध झालेल्या फायनल पराभवाचा बदला घेतला आहे. सामना कसा रंगला? पहिला क्वार्टर: सुखजीत सिंहनं पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, पण गोल करता आला नाही. दुसरा क्वार्टर: जुगराज सिंह 2 मिनिटांसाठी सस्पेंड झाला तरीही कोरिया गोल करू शकला नाही. दिलप्रीत सिंहनं दुसरा गोल करत भारताला 2-0 ची आघाडी दिली. हाफ-टाईम: भारत 2-0 ने आघाडीवर. तिसरा क्वार्टर: दिलप्रीत सिंहचा दुसरा गोल; भारत 3-0 वर. चौथा क्वार्टर: कोरियानं जोरदार प्रयत्न केले पण अमित रोहिदासनं भारताकडून चौथा गोल केला. अखेरीस सामना भारतानं 4-1 ने जिंकला. भारताचा बदला पूर्ण 2013 च्या आशिया कप फायनलमध्ये दक्षिण कोरियानं भारताला 4-3 ने पराभूत केलं होतं. तब्बल 12 वर्षांनी भारतानं त्या पराभवाचा बदला घेतला आणि कोरियाला 4-1 अशा फरकानं हरवलं.

Hockey Asia Cup 2025: भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत चौथ्यांदा आशिया कप जिंकला Read More »

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट

पटना | बिहारची राजधानी पटना येथील तख्त श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराला आरडीएक्सने उडवण्याची धमकी मिळाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. जीमेलवर आलेल्या या धमकीनंतर त्वरित प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि संपूर्ण परिसरात हाई अलर्ट जारी करण्यात आला. धमकीनंतर प्रशासन सतर्क धमकीची माहिती मिळाल्यानंतर प्रबंधन समितीने जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि चौक पोलीस ठाण्याला कळवले. तत्काळ बम निरोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गुरुद्वाराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. ई-मेलमध्ये काय लिहिलं होतं? प्रबंधन समितीचे सदस्य जगजीत सिंह यांनी सांगितले की, मेलमध्ये लिहिलं होतं – “आपल्या गुरु लंगर कक्षात चार RDX आधारित IEDs ठेवण्यात आले आहेत. विस्फोटापूर्वी व्हीआयपी आणि कर्मचारी तातडीने बाहेर निघून जा.” या संदेशानंतर गुरुद्वारा परिसरात क्षणात खळबळ उडाली. तपासात काहीही संशयास्पद सापडले नाही बम निरोधक पथकाने संपूर्ण तपास केला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. प्राथमिक तपासातून हे मेल एखाद्या शरारती व्यक्तीकडून पाठवले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आता या ई-मेलचा स्त्रोत आणि प्रेषकाचा शोध घेत आहेत.

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट Read More »

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत

नवी दिल्ली | देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी १० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मंगळवार उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींनी टाकला पहिला मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करून या निवडणुकीची सुरुवात केली. मतदानानंतर ते हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजग विरुद्ध विरोधक या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे (राजग) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा थेट सामना विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्याशी होत आहे. मतदान प्रक्रिया आणि सदस्यसंख्या मतदान संसद भवनातील एफ-१०१ वसुधा कक्षात पार पडत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य सहभागी होतात. राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य (सध्या ५ जागा रिक्त) १२ मनोनीत सदस्य लोकसभेतील ५४३ निवडून आलेले सदस्य (सध्या १ जागा रिक्त) एकूण ७८८ सदस्यांपैकी सध्या ७८१ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत.

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत Read More »

छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली

मुंबई | छत्रपती संभाजीनगरातील अविष्कार कॉलनीत २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे असून ती फार्मास्युटिकल सायन्सची विद्यार्थिनी होती. काही महिन्यांपूर्वीच तिने वाळूज औद्योगिक परिसरातील एका औषध कंपनीत नोकरी सुरू केली होती. आई-भावाला लिहिली सुसाइड नोट मृत्यूपूर्वी निकिताने आई व भावाला उद्देशून सुसाइड नोट लिहली आहे. “मम्मी, भाऊ, दादा-दादी मला माफ करा. बाबा देखील मला सोडून गेले, मी आता जगून थकले आहे” असे भावनिक उद्गार तिने नोंदवले. आपल्या भावाला आईची काळजी घेण्याची विनंतीही तिने केली आहे. जेवणासाठी बोलावलं पण उत्तर मिळालं नाही राहुरी तालुक्यातील मूळची असलेली निकिता दोन मैत्रिणींसोबत अविष्कार कॉलनीत राहात होती. रविवारी तिच्या सहेल्या गावाला गेल्याने ती एकटी होती. रात्री दहा वाजता मित्रांनी तिला जेवणासाठी बोलावले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. निकिताच्या सुसाइड नोटमध्ये मृत्यूचं नेमकं कारण नमूद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली Read More »