konkandhara.com

Editorial

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन

बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत. बीडकरांचं स्वप्न अखेर साकार गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाची उत्सुकता शिगेला बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत. “बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन Read More »

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं – “लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?” नेमकं काय आहे प्रकरण? १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला. आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप Read More »

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही”

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात,” असा टोला राऊतांनी लगावला. बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करणं म्हणजे ते त्यांच्या जवळचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्याचा प्रयत्न? संजय राऊत म्हणाले, “बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. याचा अर्थ ते त्यांचीच माणसं होती. पोलिसांना कारवाई थांबवायला सांगणं म्हणजे नियमांबाहेरचं काम. याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात.” राऊतांनी अजित पवारांच्या भाषणातील मुद्दाही आठवला. “अजित पवार नेहमी म्हणतात मी नियमबाह्य काही करत नाही. मग या घटनेत पोलिसांना बेकायदेशीर कामांना संरक्षण का द्यावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? या प्रकरणात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना लक्ष्य करणाऱ्या आमदारांच्या पत्रावरही राऊतांनी टीका केली. “त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? नियम आणि कायदा सांगणं हेच त्यांचं काम आहे. उपमुख्यमंत्र्यांना कायद्याचं भान करून दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय. हे दुर्दैवी आहे.” “90% मंत्रिमंडळ खाली जाईल” संजय राऊतांनी सरकारवर मोठा घणाघात करताना म्हटलं – “नैतिकतेवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ घरी जाईल. शिंदे गटाचे सर्व मंत्री पदावर राहणार नाहीत. अजित पवारांचे मंत्रीसुद्धा टिकणार नाहीत. प्रत्येकावर आरोप आहेत, प्रत्येक जण बेकायदेशीर कामांत गुंतलेला आहे.”

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही” Read More »

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर

मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले. “दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती” सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले – “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले – “मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.” त्यांनी पुढे भर दिला – “मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर Read More »

Ratnagiri Crime: बिअर शॉपीत बोलवून गर्लफ्रेंडची हत्या, ६० फूट दरीत मृतदेह सापडलातीन खून प्रकरणातील गूढ उलगडले; पोलिस तपास सुरु

रत्नागिरी: जिल्ह्यातील एका बिअर शॉपीतून तरुणीला बोलवून नेल्याचा प्रकार समोर आला. नंतर तिचा मृतदेह ६० फूट खोल दरीत सापडला, आणि तपासात पोलिसांना तीन खून प्रकरणांची गुंतागुंत उघड झाली. प्रकरणाचा तपशील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक युवतीला तिच्या मित्राने किंवा ओळखीच्या व्यक्तीने बिअर शॉपीमध्ये बोलवले. काही तासांनंतर तिचा मृतदेह दरीत सापडला. प्राथमिक तपासात, मृत्यूचे कारण सावरलेले शारीरिक दुखापत असल्याचे लक्षात आले. पोलिसांचा तपास रत्नागिरी पोलीस तपास करत आहेत आणि आरोपींच्या संपर्क व हालचालींवर लक्ष ठेवले आहे. तपासात असे आढळले की, मृत्यूच्या मागे तीन खून प्रकरणांची गुंतागुंत आहे. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची चौकशी सुरू केली असून, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनाची प्रतिक्रिया पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर पकडून न्यायालयीन कारवाईसाठी तयार केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Ratnagiri Crime: बिअर शॉपीत बोलवून गर्लफ्रेंडची हत्या, ६० फूट दरीत मृतदेह सापडलातीन खून प्रकरणातील गूढ उलगडले; पोलिस तपास सुरु Read More »

इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन

जळगाव – “जेवणात जसं लोणचं लागतं, तसंच थोडं इंग्रजी यायला हरकत नाही. पण आपल्या मातृभाषेचा आदर राखलाच पाहिजे,” असा अनोखा सल्ला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला. शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात त्यांनी पुढाऱ्यांची मुलं विरुद्ध शिक्षकांची मुलं यांच्यातील तुलना मांडली. “आदर्श शिक्षकांची मुलं मोठ्या पदावर असतात. पण पुढाऱ्यांची मुलं फार मोठ्या ठिकाणी नसतात. राजकारण्यांकडे प्रॉपर्टी असते, पण शिक्षकांची खरी प्रॉपर्टी म्हणजे त्यांची घडलेली मुलं,” असे ते म्हणाले. “इंग्रजी मीडियमची मुलं फोडून मराठी शाळेत घ्या” गुलाबराव पाटील यांनी शाळांच्या पटसंख्येवर भाष्य करताना म्हटलं – “जशी भाजप कोणालाही पक्षात घेत असते, तशीच तुम्ही इंग्रजी मीडियमची मुलं फोडून जिल्हा परिषद शाळेत घ्या. मराठी शाळांची पटसंख्या वाढली तरच आदर्श शिक्षक घडतील.” त्यांनी हेही सांगितले की पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक भरती रखडली आहे. मराठी शाळांची स्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे, मात्र अजूनही पटसंख्या टिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आदर्श शिक्षक आणि कुटुंबाचा वाटा सोहळ्यात पाटील म्हणाले – “आदर्श शिक्षक होण्यात पत्नींचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांच्या आधारामुळेच गुरुजी आपलं कर्तव्य पार पाडू शकतात. आदर्श शिक्षकांवर कोणी टीका करत नाही. ते समाजात विद्यार्थी घडवण्याचं महान काम करतात.” शिक्षकांसाठी ड्रेसकोडची मागणी शाळांमधील शिक्षकांच्या शिस्तीवर बोलताना पाटील म्हणाले – “पूर्वीचे शिक्षक नेहमी ड्रेसकोडमध्ये असायचे. आता तसं नाही. पण शाळेत तरी शिक्षकांचा ड्रेसकोड असायलाच हवा. कारण गुरु हा देवाच्या स्थानी असतो.”

इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन Read More »

अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी

सोलापूर – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्या व्हिडीओ कॉलमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आता माघार घेतली आहे. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकीबाबत UPSC चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिल्यानंतर मिटकरींनी सोशल मीडियावर दिलगिरी व्यक्त केली. दिलगिरी व्यक्त करत घेतला यूटर्न अमोल मिटकरींनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं – “सोलापुर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्ण सहमत आहे.” चौकशीची मागणी, नंतर माघार शुक्रवारी मिटकरींनी UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. “पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असावा,” असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र राज्यभर निर्माण झालेल्या चर्चेनंतर मिटकरींनी आज आपली भूमिका मागे घेतली. नेमकं प्रकरण काय? माढा तालुक्यातील कुर्डू गावात मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान गावकऱ्यांशी वाद झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला.व्हिडीओत अजित पवार स्वतःचा परिचय देत “डीसीएम अजित पवार बोल रहा हूं… कार्यवाही बंद करो” असे सांगताना दिसतात. त्यावर कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. पवार रागावत “इतनी डेरिंग है तुम्हारी… मेरा चेहरा तो पहचानोगा ना” असे म्हणत व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसले.

अजित पवार – महिला IPS वाद प्रकरणात अमोल मिटकरींचा यूटर्न“माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नव्हती; पोलिस दलाबद्दल सर्वोच्च आदर” – अमोल मिटकरी Read More »

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा

बारामती – बारामतीत काल ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा पार पडल्यानंतर आज त्याच ठिकाणी ओबीसी समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरंदरमध्ये घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. जरांगे यांच्या वक्तव्याविरोधात संताप मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणादरम्यान धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचं सांगितलं जातं. “मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आम्ही प्रशासनाला दिले आहेत. तरीदेखील कारवाई होत नाही. 1 तारखेपासून आम्ही मागणी करत आहोत, 5 तारखेला भव्य मोर्चा काढला. पण सरकार गुन्हा दाखल करत नाही. नेमका कोणत्या दबावामुळे हा विलंब होतोय, हे समजत नाही,” असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पुरंदरमध्ये फडणवीसांना जाब विचारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमाजी नाईक जयंतीनिमित्त पुरंदरला येणार आहेत. त्यावेळी त्यांना जाब विचारण्याची तयारी ओबीसी समाजाने केली आहे. “तुम्ही आमच्या राजाजवळ नतमस्तक होता, पण दुसरीकडे आमच्यावर अन्याय होत आहे. आमचं सरकार असतानाही मनोज जरांगे यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना थेट विचारणार आहोत,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. बारामती व परिसरात ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत असून, आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.

बारामतीत ओबीसींचं ठिय्या आंदोलन; मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी“फडणवीसांना पुरंदरमध्ये घेराव घालणार” – ओबीसी समाजाचा इशारा Read More »

संकटावर मात करत कोल्हापूरची प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंटदिवंगत जवान निलेश खोत यांच्या पत्नीचा प्रेरणादायी प्रवास; चेन्नईत OTA मधून पासिंग आऊट परेड

कोल्हापूर – संकटावर मात करत धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांचा आजचा (दि.6) दिवस अभिमानास्पद ठरला. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (OTA) पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना लेफ्टनंट पद मिळाले. प्रियांका खोत या दिवंगत नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत. निलेश खोते सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2022 मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्याआधीच प्रियांका यांनी वडिलांना गमावले होते. या दुहेरी आघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या परिस्थितीत खचून न जाता प्रियांका यांनी भारतीय सैन्यात सेवा करण्याचा निर्धार केला. त्यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन कठोर परिश्रम केले. आज त्या परेडनंतर लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. दरम्यान, या यशाबद्दल प्रियांका म्हणाल्या – “निलेश यांनी कायम देशसेवा केली. त्यांचा वारसा पुढे नेणं हेच माझं ध्येय आहे. कुटुंब आणि देशासाठी ताकदीने उभं राहणं हेच खरं समाधान आहे.” कोल्हापूर आणि राज्यभरातून प्रियांकाचे अभिनंदन होत असून त्यांच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

संकटावर मात करत कोल्हापूरची प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंटदिवंगत जवान निलेश खोत यांच्या पत्नीचा प्रेरणादायी प्रवास; चेन्नईत OTA मधून पासिंग आऊट परेड Read More »

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री

मुंबई/ठाणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशाच जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर जरांगे यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यानंतर लगेचच भाजपकडून ‘देवाभाऊ’ मोहिम पुढे आल्याचं स्पष्ट होत आहे. या बॅनरवर “कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच – देवेंद्रजी फडणवीस” असं लिहिलं आहे. तसेच “छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा – देवाभाऊ” असाही मजकूर देण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीदेखील ही बॅनरबाजी भाजपकडूनच राबवली गेल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं – “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने एकत्रितपणे केलं आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून पुढे काम करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.” राजकीय वर्तुळात या हालचालींना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिलं जात आहे.

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री Read More »