konkandhara.com

5 अप्रैल 2026

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता. ३) कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दरवर्षी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर यंदाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार सौ. स्वप्ना यादव यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झाले, तर समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या राजश्रीताई पाटील, भागिरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुरेखा लवांडे, सहसचिव सौ. भारतीताई मुथ्था, संचालिका सौ. निलिमा बावणे, ॲड. अंजलीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. स्वप्ना यादव यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या प्रभावी आणि जबाबदार कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे चिपळूणसह संपूर्ण सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल Read More »

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे. उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ Read More »

रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रत्नागिरी विभागाला तब्बल १०० बसेस मिळणार आहेत. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील ९ आगारांमध्ये दाखल होणार आहेत. मुंबई येथे नुकतेच या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल होणार आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ३ बाय २ आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी सेवेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवास करताना अनेक प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन ३ बाय २ आसन क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या बसेसमुळे अधिक प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळणार आहे. या योजनेची सुरुवात नागपूर येथून होणार असून प्रारंभी तेथे ५० बसेस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांना बसेस देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात या बसेस लवकरच दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी” Read More »

मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही सेवा, त्याच दिवशी बंद पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.इतक्या चर्चेत असलेला हा प्रकल्प एवढ्या लवकर का बंद पडला?यामागची कारणं आता समोर येऊ लागली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,ही सेवा कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.मात्र, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली.फक्त प्रवासच नाही,तर बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग असल्याच्या तक्रारी समोर आल्या.त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत होता.याशिवाय,या बोटीत मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे.शौचालय, बसण्याची सोय, विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा या बाबतीतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.एकीकडे मोठा गाजावाजा…आणि दुसरीकडे अपुरी सेवा…यामुळे प्रवाशांचा अनुभव समाधानकारक ठरला नाही.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,या सेवेला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.दररोज ५० पेक्षाही कमी प्रवासी या सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच,प्रवाशांचा कमी प्रतिसाद,महागडे तिकीट दर,अपुर्‍या सुविधाआणि वाढती नाराजी…या सगळ्यांचा परिणाम म्हणूनमुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याचं चित्र दिसत आहे. आता प्रश्न असा आहे की,कोकणासाठी महत्त्वाकांक्षी मानला गेलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार का?की ही सेवा फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार?याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद Read More »

sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून त्यांच्यासमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत हर्षल सुभाष गवंडी (वय २६, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे संबंधित संशयित हा संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ९.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित विद्यार्थिनी देवरूख येथील संगणक वर्ग आटोपून बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. तेथून त्या पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांचा पाठलाग सुरू केला. मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ संशयिताने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींची टेहळणी केली. त्यानंतर काही अंतरावर पुन्हा विद्यार्थिनींच्या जवळ जाऊन त्याने अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेनंतर पालकांनी विद्यार्थिनींना धीर देत २ एप्रिल रोजी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे करत आहेत.

संगमेश्वरात धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनींचा पाठलाग करून अश्लील कृत्य; संशयित अटकेत Read More »