रत्नागिरी: रत्नागिरी तालुका दक्षिण येथे भारतीय जनता पार्टीतर्फे SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी भूषवले.
निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्लोकनाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या BLO 2 कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर कोणत्या पद्धतीने प्रभावी काम करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन दादा दळी यांनी केले. तसेच 6 एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेत, संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना दिशा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेश पाथरे यांनी केले, तर प्रास्ताविक अवधूत कळंबटे यांनी मांडले. यावेळी माजी महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनीही मार्गदर्शन केले.
या संमेलनाला सुशांत पाटकर, महेश खानविलकर, अनघा साळवी, भाई जठार, चिराग खटकुळ, संतोष बोरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















