konkandhara.com

बातमी

डिझेल दरवाढीने मच्छिमार अडचणीत; केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी – नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री, पंचायती राज तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह जी यांच्या कडे सविस्तर पत्र पाठवून केली आहे. राज्यातील 136 मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या सुमारे 7,550 यांत्रिक मासेमारी नौकांसाठी डिझेल कोटा मंजूर असला तरी प्रत्यक्षात वाढत्या दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतारांमुळे डिझेल दरात झालेली वाढ ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.सहकारी संस्थांना ‘बल्क कन्झ्युमर’ म्हणून वर्गीकृत केल्याने मच्छीमारांना किरकोळ दरांपेक्षा जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांपेक्षा मच्छीमारांवर अधिक आर्थिक भार पडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.वाढत्या इंधन खर्चाचा भार सहकारी संस्थांना सहन करणे कठीण जात असून, हा खर्च अखेरीस वैयक्तिक मच्छीमारांवर टाकला जात आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासेमारीच्या फेऱ्या कमी कराव्या लागत असून, याचा थेट परिणाम मासळी उत्पादन आणि उत्पन्नावर होत आहे. या परिस्थितीमुळे मच्छीमार, मजूर, मासळी विक्रेते आणि संबंधित व्यवसायांवर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय हा अन्नसुरक्षा आणि निर्यातीसाठी महत्त्वाचा क्षेत्र असतानाही, शेतीप्रमाणे इंधन अनुदान किंवा संरक्षण यंत्रणा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे पुनर्वर्गीकरण करून किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देणे, लक्षित डिझेल अनुदान किंवा थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लागू करणे, तसेच मत्स्यव्यवसायाला इंधन संरक्षण योजनांमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसायासाठी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिल्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, Read More »

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधला आहे. गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष Read More »

commercial-gas-shortage-hostel-pg-hotel-business-impact

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. स्वयंपाकासाठी आवश्यक असणारा गॅस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तसेच कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थापकांनी तात्पुरते बंद करण्याचा विचारही सुरू केला आहे. गॅस टंचाईचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक ठिकाणी स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक हॉस्टेल्स आणि पीजी व्यवस्थांवर मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना आणि बाहेरगावी राहणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती आपल्याला एका मोठ्या वास्तवाची जाणीव करून देते की, युद्धं आता फक्त बातम्यांमधील घटना राहिलेली नाहीत. त्याचे परिणाम थेट आपल्या दैनंदिन आयुष्यावर दिसू लागले आहेत.” ते पुढे म्हणाले की, जगात कुठेही संघर्ष किंवा युद्ध झाले तरी त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर आणि सामान्य लोकांच्या जीवनावर होतो. “युद्ध ही दूर घडणारी घटना नसून त्याचे पडसाद आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कुठलेही युद्ध हे वाईटच,” असेही त्यांनी नमूद केले. सध्या गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉस्टेल चालक, पीजी व्यवस्थापक आणि हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया Read More »

mumbai-goa-highway-inauguration-nitin-gadkari-statement

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली. महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.

मुंबई–गोवा महामार्गाच्या उद्घाटनाबाबत संकोच; उद्घाटन करणार नाही: नितीन गडकरी Read More »

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा देवरुख : इस्राईल तसेच अमेरिका–इराणदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतूक बंद झाल्याने दुबईमध्ये अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील नागरिक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत. यात देवरुख येथील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांच्यासह एकूण १३ जणांचा समावेश आहे. हे सर्व जण गुरुवारी (ता. ५) सकाळी हैद्राबाद व बेंगळुरू विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विविध वाहनांनी ते आपल्या गावी परतले.मायदेशी परतलेल्या नागरिकांमध्ये सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू) शेट्ये, सोनम शेट्ये यांच्यासह अन्य चार जणांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्टे हेही चिपळूणला सुखरूप परतले आहेत. दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना काही दिवस हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. नंतर दुबई प्रशासन आणि केंद्र सरकारने विमानसेवेची व्यवस्था केल्यानंतर बुधवारी (ता. ४) एक जण मुंबईत, तर सहा जण हैद्राबाद आणि सहा जण बेंगळुरू येथे विमानाने दाखल झाले. यानंतर गुरुवारी ते सर्वजण आपल्या गावी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील १३ जण मायदेशी परतले; जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांचाही समावेश Read More »

महाडमध्ये रिक्षा पलटी; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

दिनेश चाफळकर, महाड महाड | १२ फेब्रुवारी २०२६:महाड तालुक्यातील दहिवड गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २५ वर्षीय सुजित सुधीर सकपाळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासह चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महाड परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुजित सकपाळ हा आपल्या मित्र-मैत्रिणींसह महाड एमआयडीसी परिसरात फिरून परत येत होता. तो स्वतः ऑटो रिक्षा चालवत होता. दहिवड गावाजवळ रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात इतका गंभीर होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. जखमींवर उपचार सुरू या अपघातात समृद्धी सुधीर धायळकर, अनिकेत शशिकांत धायळकर, रोहिणी हिरामण धायळकर आणि अंतरा शशिकांत धायळकर हे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती सुजित सकपाळ याला मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंद या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सुरक्षित वाहनचालना गरजेची या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना वेगमर्यादा पाळण्याचे आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांनीही या मार्गावर वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू Read More »

WhatsApp Image 2025 10 14 at 2.51.26 AM 1

EPFO सदस्यांना खात्यातील 100% रक्कम काढण्याची मुभा; मोठा निर्णय

📰 EPFO सदस्यांना खात्यातील 100% रक्कम काढण्याची मुभा; केंद्रीय विश्वस्त मंडळाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली | १३ ऑक्टोबर २०२५:कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.आता सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण 100 टक्के रक्कम काढता येणार आहे.हा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. 🏦 पूर्वीचे नियम आता सुलभ — कारण सांगण्याची अट रद्द पूर्वी रक्कम काढताना सदस्यांना विशिष्ट कारण सांगणे आवश्यक असायचे,तसेच अनेक अर्ज तांत्रिक कारणांमुळे फेटाळले जायचे.नव्या निर्णयानुसार ही अट पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, “सदस्य आता त्यांच्या कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या हिस्स्याची एकत्र रक्कम पूर्णपणे काढू शकतील,कोणतेही कारण नमूद करण्याची आवश्यकता राहणार नाही.” 💰 २५% रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक तथापि, सदस्यांनी त्यांच्या खात्यात किमान २५ टक्के रक्कम कायम ठेवावी लागेल.या शिल्लक रकमेवर त्यांनावार्षिक व्याज आणि चक्रवाढ नफ्याचा लाभ मिळत राहील. यामुळे खाते बंद न होता दीर्घकालीन आर्थिक संरक्षण टिकून राहील. 🧾 PF नियमांत तीन सोप्या श्रेणी पूर्वी अस्तित्वात असलेले १३ गुंतागुंतीचे नियम आता सुलभ करूनफक्त तीन मुख्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत: 1️⃣ आवश्यक गरजा: शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारणे2️⃣ गृहसंबंधी गरजा: घर खरेदी/दुरुस्ती3️⃣ विशेष परिस्थिती: आपत्कालीन किंवा वैयक्तिक आर्थिक अडचणी 🎓 शिक्षण आणि विवाहासाठी नियम शिथिल शिक्षणासाठी १० वेळा रक्कम काढण्याची परवानगी विवाहासाठी ५ वेळा रक्कम काढता येणार विशेष परिस्थितीत कारण सांगण्याची गरज नाही या सुलभतेमुळे अनेक अर्ज मंजूर होतीलआणि सदस्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेवर मिळेल. ⏱️ सेवा कालावधी आणि आगाऊ रकमेचे नवे नियम आंशिक रक्कम काढण्यासाठी आवश्यक सेवा कालावधी १२ महिने (पूर्वी ५ वर्षे) आगाऊ रक्कम काढण्याची मुदत २ महिन्यांवरून १२ महिने अंतिम पेन्शन काढण्याची मुदत २ महिन्यांवरून ३६ महिने करण्यात आली आहे. या बदलामुळे सदस्यांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठीफंड वापरणं सोपं होईल, आणि निवृत्ती निधी कायम संरक्षित राहील. 🗣️ कामगारमंत्री मनसुख मांडविया म्हणाले “ईपीएफओ सदस्यांना लवचिकता आणि पारदर्शकता देणं हे आमचं प्राधान्य आहे.हा निर्णय कामगारांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि विश्वासार्ह सामाजिक सुरक्षा प्रणालीसाठी महत्त्वाचा टप्पा आहे.” 📈 या निर्णयाचे फायदे सदस्यांना तातडीच्या खर्चासाठी तत्काळ आर्थिक मदत खातं बंद न होता चक्रवाढ व्याजाचा लाभ सुरू अर्ज फेटाळले जाण्याचं प्रमाण कमी पेन्शन आणि बचत या दोन्हींचा समतोल EPFO च्या नव्या निर्णयामुळे भारतातील कामगार वर्गालाआर्थिक सक्षमता आणि तातडीच्या परिस्थितीत निधी वापरण्याची मोकळीक मिळाली आहे. “शाश्वत सुरक्षा आणि आर्थिक स्वातंत्र्य —या दोन्हींचं संतुलन साधणारं हे सुधारित मॉडेल,”असं तज्ञांचं मत आहे.

EPFO सदस्यांना खात्यातील 100% रक्कम काढण्याची मुभा; मोठा निर्णय Read More »

Web Banner 17

आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

आशिया चषक (Asia Cup 2025) मध्ये 14 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या भारत–पाकिस्तान सामन्याने राजकीय वाद पेटवला आहे. भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने सहज विजय मिळवला, मात्र सामन्याच्या निकालापेक्षा त्याभोवतीचा वाद अधिक चर्चेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत–पाक क्रिकेट होऊ नये, अशी देशभरात मागणी होत होती. तरीही सरकारकडून परवानगी मिळाल्याने टीम इंडिया मैदानात उतरली. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून बीसीसीआय आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला. https://x.com/RajThackeray/status/1968156078887371163/photo/1 🎨 व्यंगचित्रात अमित शाह आणि जय शाह यांचं प्रतीकात्मक चित्रण आहे. “अरे बाबांनो उठा… आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले,” असं म्हणत, खरं तर कोण जिंकलं आणि कोण हरलं, हा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. व्यंगचित्रात पहलगाम हल्ल्यातील शहीदांचाही संदर्भ आहे. 👉 दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही केंद्रावर हल्लाबोल केला. “टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही म्हणून भाजपवाले कौतुक करत आहेत. पण मैदानात तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलात ना? हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर होऊ शकत नाही,” असं राऊत म्हणाले. त्यांनी सुनील गावसकरांच्या विधानाचा दाखला देत, टीम इंडियाला सरकारनेच पाकिस्तानविरुद्ध खेळायला भाग पाडलं, असा आरोप केला. या वादामुळे भारत–पाक क्रिकेट सामना पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आला आहे.

आशिया कप भारत–पाक सामना : राज ठाकरेचं व्यंगचित्र आणि संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल Read More »

WhatsApp Image 2025 09 06 at 11.17.23 PM

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

नवी दिल्ली – अदाणी समूहाच्या अदाणी एंटरप्रायजेस लिमिटेड (AEL) कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने काही पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय एनजीओंना (NGOs) कंपनीविरुद्ध बदनामीकारक आणि पडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास रोखले आहे. तसेच विद्यमान लेख, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओमधील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. काय आहे प्रकरण? अदाणी एंटरप्रायजेसने दाखल केलेल्या दाव्यानुसार, काही विशिष्ट वेबसाइट्स व व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात नकारात्मक आणि हेतुपुरस्सर मजकूर प्रसारित केला जात होता. यात ‘paranjoy.in’, ‘adaniwatch.org’ आणि ‘adanifiles.com.au’ या संकेतस्थळांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या मजकुराचा उद्देश त्यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला धक्का पोहोचवणे आणि व्यवसायिक कामकाजात अडथळे आणणे हा होता. या प्रकरणातील प्रतिवादींमध्ये परंजय गुहा ठाकुर्ता, रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयस्कंता दास, आयुष जोशी, बॉब ब्राउन फाउंडेशन, ड्रीमस्केप नेटवर्क इंटरनॅशनल प्रा. लि., गेटअप लि., डोमेन डायरेक्टर्स प्रा. लि. (इन्स्ट्रा) आणि जॉन डो यांचा समावेश आहे. न्यायालयाचे निरीक्षण वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अनुज कुमार सिंह यांनी सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवले की : “अदाणी एंटरप्रायजेसच्या बाजूने प्रकरण प्रथमदर्शनी योग्य दिसते. सततचा बदनामीकारक मजकूर, रिट्विट आणि ट्रोलिंगमुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मीडिया ट्रायलला बळी पडावे लागू शकते.” न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादींना पडताळणी न केलेला व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून रोखले आहे. तसेच, ५ दिवसांच्या आत सोशल मीडिया पोस्ट्स व लेखांमधून वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर मजकूर हटवणे शक्य नसेल, तर संपूर्ण पोस्ट/लेख हटवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. टेक कंपन्यांनाही आदेश जर प्रतिवादींनी आदेशाचे पालन केले नाही, तर गूगल, युट्यूब, आणि एक्स (माजी ट्विटर) यांसारख्या मध्यस्थांना (Intermediaries) ३६ तासांच्या आत मजकूर हटवणे किंवा वापर थांबवणे बंधनकारक असेल, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला Read More »