konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • घसा बरा झाल्याच्या ‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर
‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

घसा बरा झाल्याच्या ‘चमत्कार’ दाव्यावरून वाद; रितू तावडे यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर

प्रतिनिधी : कोकणधारा

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनींच्या आशीर्वादामुळे घशाचा त्रास दूर झाल्याचा दावा केल्यानंतर राज्यात वादंग निर्माण झाला आहे. अंधश्रद्धेविरोधातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली असून, त्यांनीही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मंगळवारी महावीर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना तावडे यांनी सांगितले की, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून त्यांना घशाचा त्रास होता. औषधोपचार करूनही फरक पडत नव्हता. मात्र जैनमुनी नम्रमुनी महाराज यांच्या आशीर्वादानंतर आपला आवाज सुधारला असून, हा “चमत्कार” असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याचा आरोप होत आहे.

या वक्तव्यानंतर विविध स्तरांतून टीका झाली. संजय राऊत यांच्यासह अनेकांनी तावडे यांच्यावर निशाणा साधला. यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत तावडे यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

“ट्रोल करणाऱ्यांच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाहीत?” असा सवाल करत त्यांनी टीकाकारांवर संताप व्यक्त केला. बोरीवली येथे आयोजित कार्यक्रमात आपण केवळ आदरभाव व्यक्त केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

तावडे पुढे म्हणाल्या की, नम्रमुनी महाराजांनी त्यांना ‘ओम’चा उच्चार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी त्याचा नियमित सराव केल्यानंतर आवाजात सुधारणा झाली. “यात कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलेले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच आपण स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचे भक्त असल्याचे सांगत, नम्रमुनी महाराजांप्रतीही श्रद्धा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धा विरुद्ध श्रद्धा या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे.

Releated Posts

रत्नागिरीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त

रत्नागिरी: प्रतिनिधी मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लाईट लावून…

ByByEditorial अप्रैल 6, 2026

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल