मराठा आरक्षणाच्या सरकारी निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत भुजबळ आणि ओबीसी नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. “भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार,” असा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षणावर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन जीआरनंतर समाजात असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी “जरांगे हे मराठ्यांचे नेते नाहीत” अशी टीका करत त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा विचारला.
या वक्तव्यानंतर मराठा आंदोलन पुन्हा तापले असून जरांगे यांच्या समर्थकांनी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत.
ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्न आता केवळ सामाजिक नव्हे, तर राजकीय चढाओढीचा केंद्रबिंदू बनला आहे. भुजबळ यांचे वक्तव्य आणि जरांगेंचा प्रत्युत्तर या दोन्ही घटनांमुळे आगामी निवडणुकांपूर्वी राज्यातील ओबीसी–मराठा समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
सरकारकडून मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.















