konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार
Image

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार

मुंबई | कोंकणधारा डेस्क:
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर निवडणुकीबाबत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी ११ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला जाणार असून, ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आल्याने ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाची रणनीती चर्चेत

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ठाकरे गट थेट मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सहकार्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी बनली आहे.

आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स कायम ठेवला

या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भूमिका मांडण्याऐवजी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “आमची तयारी सुरू आहे. आम्ही उमेदवार देणार की नाही, हे तुम्हाला लवकरच समजेल. याबाबत आत्ता काही बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे. आता शहराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा; आमच्या पक्षाची माणसं कामाला लागली आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौर निवडणुकीचा तिढा आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

आरक्षण सोडतीनंतर समीकरण बदलले

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौरपद कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपचा महापौर होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, ठाकरे गट उमेदवार देणार असल्यास ही निवडणूक थेट लढतीत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ट्रॅफिकवरही भाष्य

दरम्यान, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “पत्रव्यवहार करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश द्यायला हवेत. एमएसआरडीसी कोणाकडे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील,” असा टोला त्यांनी लगावला.

“३२ तास लोक वाहतूक कोंडीत अडकले होते. फोटो काढायला पुढे असणारे मंत्री त्या दिवशी कुठे होते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोल ऑपरेटरांनी रिफंड आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली. चौकशी आणि क्लीन चिट देण्याची प्रथा मागील चार वर्षांपासून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, किमान प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवणे, पर्यायी लेन सुरू करणे किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. “हेलिकॉप्टरचा वापर मंत्री प्रचारासाठी करतात; त्याच माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांना मदत करता आली असती,” असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या हालचालींमुळे राजकीय सस्पेन्स वाढला आहे. बिनविरोध निवडणूक होणार की थेट लढत पाहायला मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहराच्या प्रशासकीय आणि वाहतूक प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप–प्रत्यारोपांमुळे मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे.…

ByByEditorial अप्रैल 2, 2026

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय;सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा: विकास लवांडे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चांवर शरद पवार गटाने ठाम…

ByByEditorial अप्रैल 1, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

रत्नागिरीत एलईडी मासेमारीवर कारवाई; ‘भराडी प्रसन्न’ नौका जप्त
चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल