konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू
khed-khan-chemical-blast-death-toll-3

खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. बंगाल, सध्या रा. आवाशी, खेड) असे मृत कामगाराचे नाव असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे.

६ मार्च रोजी खान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे गरम रसायन कामगारांच्या अंगावर उडाले, तसेच छप्पर कोसळल्याने एकूण अकरा कामगार जखमी झाले होते. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले होते.

या दुर्घटनेत यापूर्वी ११ मार्च रोजी मुरडे येथील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) यांचा, तर १२ मार्च रोजी लातूर येथील असद खान यांचा मृत्यू झाला होता. उपचार सुरू असलेल्या कामगारांपैकी सुजन दास याने सोमवारी (१६ मार्च) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

सुजन दास यांचे कुटुंब मूळचे बंगालमधील असून, मागील ३० वर्षांपासून ते आवाशी येथे वास्तव्यास आहे. वडील गोपाल दास यांनी मेहनतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत येथे घर उभारले. सुजनचे शिक्षणही स्थानिक पातळीवर झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचा विवाह पार पडला होता. आनंदाचे वातावरण असतानाच सुजनच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमी कामगारांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

Releated Posts

स्वप्ना यादव यांचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मान, कोल्हापूरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव; सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

प्रतिनिधी : कोकणधारा कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवारी (ता.…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

“रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेससीसीटीव्ही, अधिक आसन क्षमता; प्रवास होणार आरामदायी”

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला…

ByByEditorial अप्रैल 5, 2026

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद

प्रतिनिधी : कोकणधारा कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

चिपळूणच्या स्वप्ना यादव यांना कोल्हापूरमध्ये ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार; सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव.
खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश; स्थानिक राजकारणात खळबळ
रत्नागिरीला १०० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; अधिक सुविधा, आरामदायी प्रवास
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा बंद; कमी प्रतिसाद आणि महागडे दर कारणीभूत
sangmeshwar-student-harassment-case-accused-arrested-devrukh
chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी