konkandhara.com

5 सितम्बर 2025

रायगड | जिल्हा परिषदेसाठी शेकाप सज्ज; जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश

अलिबाग :रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “शेकापने ज्यांना मोठं केलं त्यांनी गद्दारी केली. पण त्या गद्दारांना शून्य करण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे,” असा हल्लाबोल करत त्यांनी जिल्ह्यात पुन्हा लाल बावटा फडकवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना दिलं. चेंढरे येथे शेकापची बैठक चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात शेकापची रायगड जिल्हा चिटणीस मंडळ व नवनिर्वाचित पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक पातळीवरील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रस्तरावर पोहोचण्यावर भर द्यावा, असं सांगितलं. “मनात चीड ठेवून सज्ज व्हा” “शेकापची साडेचार लाख मते आहेत, हे निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आहे. आता जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी जिद्दीने आणि मनात चीड ठेवून काम करा,” असं पाटील म्हणाले

रायगड | जिल्हा परिषदेसाठी शेकाप सज्ज; जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना निर्धाराचा संदेश Read More »

विकासाचा चेहरा — लोकांसाठी की लक्झरीसाठी?

स्वातंत्र्य दिनाचे भाषण, विकासाच्या घोषणांचा गजर, चमकदार प्रकल्पांची यादी. लोकशाहीतील हे चित्र आपण वारंवार पाहतो. मात्र या गजरात सामान्य जनतेचा आवाज कितपत ऐकू येतो? मुंबईतील २३८ नव्या एसी लोकलची घोषणा असो, अथवा अटलबांधाचा उद्घाटन सोहळा — सरकारच्या प्रकल्पांची झळाळी वाढत असली, तरी या प्रकाशझोतात बहुसंख्यांचा अंधार अधिक ठळक होतो. लोकल : मुंबईकरांचा श्वास की ‘एसी लक्झरी’? मुंबई ही लोकलवर धावते, हे वाक्य केवळ वाक्य नाही तर वस्तुस्थिती आहे. रोज ६० लाख प्रवासी लोकलमध्ये कोंबून प्रवास करतात. गर्दीत श्वास गुदमरतो, डब्याच्या दारातून लटकणं नित्याचं झालंय, सुरक्षिततेचा प्रश्न टोकाला पोहोचलाय. अशा वेळी सरकारनं तब्बल २३८ एसी लोकल आणण्याची घोषणा केली. या गाड्या मेट्रो-स्टाईल डिझाईन, कुशन सीट्स, चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेन्मेंट स्क्रीन अशा सुविधांनी सज्ज असतील. ही घोषणा ऐकताना ‘विकास’ हा शब्द मोहक वाटतो. पण आकडे वेगळंच सांगतात — इथेच विरोधाभास आहे. लोकसंख्येचा भार एका बाजूला, आणि महसूलाचं गणित दुसऱ्या बाजूला. सरकारनं निवडलेला मार्ग स्पष्ट आहे — Revenue over Relief. महात्मा गांधींचं एक वाक्य आज इथे ठळकपणे उमटतं :“भारताची खरी ताकद गरीब आणि सामान्य माणूस आहे. त्याला विसरून उभा केलेला विकास हा पोकळ ठरेल.” अटलबांध : जनतेचा पूल की खाजगी विकासाचा प्रवेशद्वार? मुंबई ट्रान्स हार्बर लिंक — अटलबांध. आशियातील सर्वांत लांब समुद्र पूल. खर्च जवळजवळ १८ हजार कोटी. उद्घाटनाच्या दिवशी झगमगाट. सरकारनं त्याला ‘विकासाचं स्वप्न’ म्हटलं. पण सत्य हे की — हा पूल जिथे संपतो, तिथेच एका खाजगी उद्योगसमूहाची (अदानी) कोट्यवधींची प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सुरू आहे. रोज प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकराच्या दैनंदिन वाहतुकीत याचा फारसा फरक पडत नाही. टोल दर सर्वसामान्यांसाठी महाग आहेत; त्यामुळे हा पूल ‘सर्वांसाठी’ नसून विशिष्ट वर्गापुरता मर्यादित. आचार्य विनोबा भावेंनी लिहिलं आहे :“विकास म्हणजे सर्वांच्या जीवनमानात सुधारणा. काहींच्या सुखसोयींवर उभा राहिलेला विकास हा अन्याय आहे.” अटलबांधाचं उदाहरण या वाक्याला पुरेपूर साजेसं आहे. लक्झरी प्रकल्पांची यादी — वास्तवाच्या पलीकडे फक्त लोकल वा अटलबांध नाही, तर सरकारच्या धोरणात एक सर्वसाधारण पॅटर्न दिसतो — बुलेट ट्रेन प्रकल्प : हजारो कोटींचा खर्च, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासात त्याचा काय उपयोग? नवे विमानतळ : आंतरराष्ट्रीय झगमगाट, पण ग्रामीण भागात अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्रं दुरावस्थेत. स्मार्ट सिटी योजना : सिमेंटचे रस्ते व डिजिटल बिलबोर्ड्स, पण पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची स्थिती बिकटच. असं का? कारण हे प्रकल्प दिसायला आकर्षक, आकडेवारीत भव्य, आणि PR साठी उपयुक्त.सामान्य जनतेच्या रोजच्या गरजा — रोजगार, शिक्षण, आरोग्य, वाहतूक — या मात्र दुय्यम ठरतात. बेरोजगारी आणि महागाईच्या छायेत ‘विकास’ आज भारतात बेरोजगारीची दर सर्वाधिक पातळीवर आहे. लाखो युवक पदवीधर होऊनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. महागाईने घरगुती अर्थकारण ढासळलं आहे. डाळी, भाजीपाला, धान्य यांच्या किमती आकाशाला भिडतायत. शिक्षण आणि आरोग्य खर्च परवडणारा राहिलेला नाही. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्झरी प्रकल्प हा जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहेत. विकासाची खरी व्याख्या लोकशाहीतील विकासाची व्याख्या ही केवळ पायाभूत सुविधांची उभारणी नव्हे. सुरक्षित प्रवास ही गरज आहे, लक्झरी नव्हे. रोजगार हा हक्क आहे, उपकार नव्हे. आरोग्य आणि शिक्षण ही मूलभूत कर्तव्यं आहेत, पर्यायी पर्याय नव्हेत. “Luxury over Necessity” ही धोरणं लोकशाहीच्या आत्म्याला घातक आहेत. कोकणधाराची भूमिका या पार्श्वभूमीवर कोकणधाराची भूमिका स्पष्ट आहे —विकासाचा चेहरा जनतेच्या दैनंदिन जीवनमानात दिसला पाहिजे. प्रवाशाला गर्दीतून सुटका मिळाली का? शेतकऱ्याला पिकाला बाजार मिळाला का? बेरोजगार युवकाला रोजगार मिळाला का? गरीबाला औषधोपचार सहज उपलब्ध झाला का? या प्रश्नांची उत्तरं जर ‘हो’ नसतील, तर तो विकास केवळ एक PR stunt आहे. निष्कर्ष मुंबई लोकलपासून अटलबांधापर्यंत, सरकारची प्राधान्यक्रम यादी स्पष्ट दिसते — महसूल, झगमगाट, आणि आकडे.लोकशाहीतील खरा विकास म्हणजे — “सर्वांसाठी संधी, सर्वांसाठी सुविधा, आणि सर्वांसाठी मानवी प्रतिष्ठा.” सरकारनं हा मूलभूत धडा विसरला, तर लोकशाहीचा पाया हादरेल.आणि म्हणूनच, या स्वातंत्र्य दिनी आपला प्रश्न ठाम आहे — “विकास खरंच लोकांसाठी आहे का, की फक्त लक्झरीसाठी?”

विकासाचा चेहरा — लोकांसाठी की लक्झरीसाठी? Read More »

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब!

पूजा खेडकर प्रकरणानंतर अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरही संशय? मुंबई :सोलापूरच्या कुर्डू गावातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणातून राज्यात मोठा वादंग उफाळलाय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉलवरून दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अंजना कृष्णांच्याच नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा स्फोटक मुद्दा उचलला आहे. “पूजा खेडकरप्रमाणेच घोळ” – मिटकरी अकोल्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असं म्हणणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पूजा खेडकर प्रकरणात जसा गोंधळ झाला, तसाच गोंधळ अंजना कृष्णांच्या UPSC निवड प्रक्रियेत झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे.” IPS अंजना कृष्णा कोण? मूळ केरळमधील त्रिवेंद्रमच्या UPSC 2023 मध्ये 355 वा क्रमांक, IPS केडर सुरुवातीला केरळमध्ये एसीपी पदावर काम सध्या सोलापूर ग्रामीण पोलिसात नियुक्ती प्रोबेशन काळातच करमाळा व माढा येथे अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई नुकत्याच मुरूम उपसा प्रकरणात ठाम भूमिका घेतल्याने चर्चेत पवारांच्या दबावाखाली कारवाई? मिटकरींच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, तर दुसरीकडे IPS अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरच प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय.

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब! Read More »

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल

मुंबई :मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एका तासाच्या आत दोन वेगवेगळे जीआर काढले गेल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पहिल्या जीआरमध्ये “मराठा समाजातील पात्र व्यक्ती” असा उल्लेख होता. मात्र मनोज जरांगेंच्या आक्षेपानंतर हा शब्द वगळून तात्काळ दुसरा जीआर काढला गेला. “जर चुकीचं होत असेल तर मी कसा काय गप्प राहू? मी माझं मत मांडणार,” असा इशारा भुजबळांनी दिला. शब्दांची हेराफेरी की धोरणात्मक गोंधळ? भुजबळांनी सरकारवर शब्दांची हेराफेरी करून आंदोलन शमवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरसकट हा शब्द काढून जीआरमध्ये शब्दांशी खेळ केला गेला. पण यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. कोर्टानेही स्पष्ट केलंय की ते सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.” ओबीसींचा वाटा कमी होणार? भुजबळांच्या मते, आधीच ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातला मोठा हिस्सा मराठा समाजाकडे जाण्याचा धोका आहे. “एका घरात दहा लोक आहेत, त्यांना बाहेर काढलं नाही; पण आणखी दहा बसवले, तर धक्का बसणारच,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभूल केल्याचा थेट आरोप भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा उल्लेख करत, “सरसकट शब्द काढून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं ठरवलंय असं सांगण्यात आलं. पण माझ्याकडे दाखले आहेत की कुणबी आणि मराठा या वेगळ्या जात आहेत. जीआर माझ्या सल्ल्याने काढला अशी दिशाभूल करू नका,” असा थेट निशाणा सरकारवर साधला. सरकार दबावाखाली? “एका तासात दोन जीआर निघाले, सचिवांच्या सह्या आहेत. हा बदल दबावाखाली झाला की प्रेमाखाली? सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे,” असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल Read More »

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मराठा समाज आरक्षणात जाणारच आणि यावर आता कुठलाही संभ्रम नाही. “कुणाच्या खोडीला काही होणार नाही. सरकारने काढलेला जीआर योग्य असून, त्यात जर त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील,” असं ठाम विधान त्यांनी केलं. सध्या उपचार घेत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. 🔹 “मुलं मुंबईतून जिवंत करून आली” जरांगे म्हणाले –“जर आमचा सरकारवर, फडणवीसांवर राग असता, तर आमची मुलं निब्बर बनियानवर असती. पण त्यांनी मुंबईत जिवंत परत येऊन दाखवलं.” 🔹 जीआर मान्य, पण त्रुटी दुरुस्त “जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करू. सुधारित जीआर लवकरच निघेल.” “प्रक्रिया, टाइम बॉंड आणि सुरुवातीची तारीख याबाबत मुख्यमंत्री व विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.” “आम्ही सरसकट आरक्षण नको म्हणत नाही, पण गरीब मराठे थेट आरक्षणात जातील.” 🔹 संजय राऊत व इतरांना प्रत्युत्तर “हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं, दुसऱ्या कुणी नाही.” “उपोषण आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं? हे आम्ही मान्य करणार नाही.” “संजय राऊत फार बोलत आहेत, एवढं बार जाऊ द्या.” 🔹 भुजबळांवर खोचक टोला “आम्ही ओबीसींमध्ये गेलो नाही, तर ते आमच्यात आले आहेत. भुजबळांना माहिती होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. त्यांनी अनेक पक्ष हाताळलेत, त्यामुळे जीआर त्यांना नीट कळतो. पण मराठा समाजाला ‘घुसखोर’ म्हणणं योग्य नाही. हे अधिकृत आहे,” असा टोला जरांगेंनी लगावला. 🔹 “मंडल आयोगावर चॅलेंज करू” “भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे.” “जर कोर्टात प्रश्न निर्माण झाले तर मी मंडल आयोगालाच चॅलेंज करेन.” 👉 एकंदर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती केली आणि विरोधकांना थेट इशारा दिला –“गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय. यात कुणाच्याही खोडीला काही होणार नाही.

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील Read More »

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा

सांगली | काँग्रेस पक्ष आज संघर्षाच्या काळातून जात असला तरी आमच्यात अद्याप ताकद आहे. राज्यातील जनतेशी अन्याय झाला, चुकीचे निर्णय झाले, तर पुढच्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांचा घाम काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा काँग्रेस आमदार व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, विजय वडेट्टीवार व खासदार विशाल पाटील उपस्थित होते. “फक्त १६ आमदार आहोत, पण…” “आज काँग्रेसचे केवळ १६ आमदार असले तरी पक्षाच्या विचारांवर उभे राहून लढणारी ताकद आमच्यात आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेविरुद्ध पावले उचलली, तर काँग्रेस शांत बसणार नाही,” असे विश्वजित कदम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे. बंटी पाटील आमचा वाघ आहे. विजय वडेट्टीवार विदर्भाचे वाघ आहेत. खासदार विशाल पाटील दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विचारांसाठी लढत आहेत.” “1980 मध्ये कार्यकर्त्यांनी दगडे झेलली” कदम यांनी आठवण करून दिली की,“1980-85 च्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्यासाठी दगडे झेलली आहेत. त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच मी पुढे काम करणार आहे. आपला पक्ष सत्तेत नसल्यामुळे कामे होत नाहीत, ही कार्यकर्त्यांची नाराजी खरी आहे. पण आजही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद अबाधित आहे.” विशाल पाटील तिकीट वाद कदम म्हणाले की,“विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला. त्या वेळी सांगलीने माझं वेगळं रूप पाहिलं. आमच्यातील एकोपा आणि लढण्याची वृत्ती अजूनही कायम आहे.” 👉 काँग्रेस राज्यात आज चौथ्या क्रमांकावर असली, तरी “सरकारला घाम फोडण्याची ताकद आमच्यात आहे” हा विश्वजित कदमांचा दावा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा ठरतोय.

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा Read More »

सिंधुदुर्ग | करुळ घाटात दरड कोसळली, १२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाट पुन्हा धोक्यात! गुरुवारी सकाळी ८ वाजता मोठी दरड कोसळून संपूर्ण घाट मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने निर्णय घेत, १२ सप्टेंबरपर्यंत घाट बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 🪨 काय घडलं? दरड कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड व चिखल साचला. त्यामुळे घाट मार्गावरची संपूर्ण वाहतूक थांबली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. 👷 आठ दिवसांचं अवघड काम घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याचे प्रकार. रस्त्यावर व आसपासच्या भागात मोठ्या भेगा पडल्या आहेत. सैल खडक हटवण्यासाठी तज्ज्ञ अभियंते दाखल. हे काम पूर्ण व्हायला किमान ८ दिवस लागणार. 📢 नागरिकांना आवाहन करुळ घाट पूर्णपणे बंद राहणार. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय. 👉 करुळ घाट हा सिंधुदुर्गला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असला, तरी वारंवार दरडी कोसळण्यामुळे तो प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. यंदा मात्र, प्रशासनाने “सुरक्षितता प्रथम” म्हणत घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग | करुळ घाटात दरड कोसळली, १२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद! Read More »

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा हायटेक किल्ला

मुंबईत गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविकांचा महासागर उसळतो. यंदा या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा सुरक्षा आराखडा तयार केला आहे. 👮 १८ हजार पोलीस दल सज्ज यावर्षी विसर्जन दिवशी तब्बल १८ हजार पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात राहणार आहे. महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) यांचा समावेश. गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त SRPF, होमगार्ड्स यांचीही नेमणूक. 📸 १० हजार कॅमेरे + ड्रोन नजर शहरातल्या प्रमुख विसर्जन मार्गांवर १० हजार CCTV कॅमेरे बसवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे आकाशातून थेट निगराणी ठेवली जाणार आहे. गर्दीची हालचाल, आपत्कालीन परिस्थिती व वाहतूक कोंडी त्वरित टिपता येणार. 🤖 पहिल्यांदाच AI ची एंट्री मुंबई पोलिसांनी यंदा पहिल्यांदाच Artificial Intelligence (AI) प्रणालीचा वापर केला आहे. AI कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या फीडचा विश्लेषण करून गर्दी कुठे धोकादायक पातळीवर आहे, कुठे संभाव्य गोंधळ निर्माण होऊ शकतो, याची माहिती अलर्ट स्वरूपात पोलिस कंट्रोल रूमला मिळणार. Facial recognition आणि suspicious activity detection चा वापरही होणार असल्याची माहिती. 🚦 ट्रॅफिकसाठी स्वतंत्र आराखडा विसर्जन मार्गावरील ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी स्पेशल कोऑर्डिनेशन सेल उभारण्यात आला आहे. BEST बसेस, मेट्रो सेवा व लोकल ट्रेन यांचे वेळापत्रक बदलून गर्दी वाहतूक व्यवस्थापनाला हातभार. 🗣️ पोलिसांचा इशारा मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, शक्यतो पायी विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावं. वाहनं विसर्जन मार्गावर लावू नयेत. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावी. 🏷️ निष्कर्ष गणेश विसर्जन म्हणजे मुंबईचं सांस्कृतिक वैभव, पण त्याचबरोबर पोलिसांसाठी गर्दी व्यवस्थापनाची सर्वात मोठी परीक्षा.👉 १८ हजार पोलीस, १० हजार कॅमेरे, ड्रोन आणि आता AI — मुंबई पोलीस यंदा विसर्जनात हायटेक सज्ज आहेत.

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा हायटेक किल्ला Read More »

मुंबई लोकल: सरकारचा ‘लक्झरी शो’ की लोकांसाठी खरंच दिलासा?

मुंबईच्या रेल्वे प्रवासाचं वास्तव म्हणजे — दररोज लाखो लोक गर्दीत कोंबले जातात, जीव धोक्यात घालून डब्यांमधून लटकतात, सुरक्षिततेचा प्रश्न टोकाला पोहोचतो. अशा वेळी सरकारनं जाहीर केलेला निर्णय मात्र धक्कादायक ठरतोय.👉 मुंबईत लवकरच येणार आहेत तब्बल २३८ नवी AC लोकल गाड्या — ज्यात कुशन सीट्स, मोबाईल चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेन्मेंट स्क्रीन, आणि मेट्रो-स्टाईल डिझाईन असेल. पण खरं प्रश्न आहे —ही लक्झरी लोकल सामान्य मुंबईकरांच्या उपयोगाची की सरकारचा केवळ “PR शो”? 🚆 ९६% प्रवासी अजूनही गर्दीत! सध्या मुंबईत दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी Non-AC लोकलमध्ये प्रवास करतात. AC लोकल वापरणारे प्रवासी फक्त २ लाख (४%). 👉 म्हणजे सरकारनं पैसा खर्च केला तो बहुसंख्य मुंबईकरांसाठी नाही, तर त्या ४% प्रवाशांसाठी! 💰 महसूल महत्त्वाचा की प्रवासी? AC लोकलनं वार्षिक ₹२१५ कोटी महसूल मिळवला; पश्चिम रेल्वेच्या एकूण कमाईत तब्बल २२% हिस्सा. Non-AC लोकलमध्ये प्रवासी प्रचंड, पण तिकिटं स्वस्त असल्याने महसूल कमी. 👉 त्यामुळे सरकारला डोळ्यासमोर दिसतं ते फक्त महसूलाचं गणित, प्रवाशांच्या हालअपेष्टा नव्हे. ⚡ PR स्टंट की लोकाभिमुख निर्णय? सरकारनं मेट्रो-स्टाईल AC लोकलचं स्वप्न रंगवलं आहे — चमकदार डिझाईन, एअर कंडिशनिंग, लक्झरी प्रतिमा… पण लोकांना खरंच हवं होतं काय? — अधिक Non-AC गाड्या, सुरक्षितता, गर्दीवर नियंत्रण, वेळेवर धावणाऱ्या गाड्या. 👉 तज्ज्ञांच्या मते, हे निर्णय लोकाभिमुख नसून “Luxury over Necessity” धोरणाचं उदाहरण आहे. 🗣️ प्रवाशांचा सवाल “सरकारनं AC गाड्यांसाठी कोट्यवधी खर्च करायचा, पण आमच्या गर्दीतल्या प्रवासाचं काय?” “सामान्य प्रवासी रोज श्वास गुदमरून प्रवास करतो. त्याच्यासाठी नवे डबे, नवे रूट, सुरक्षितता उपाय कधी?” 🏷️ निष्कर्ष मुंबई लोकल म्हणजे सामान्य माणसाचा श्वास.पण सरकारचं लक्ष दिसतंय ते गर्दीतल्या ९६% लोकांवर नाही, तर महसूल देणाऱ्या ४% प्रवाशांवर. 👉 थोडक्यात —“PR मध्ये चमकणाऱ्या AC लोकल, पण सामान्य मुंबईकरांसाठी अजूनही तोच गर्दीतला नरकप्रवास!”

मुंबई लोकल: सरकारचा ‘लक्झरी शो’ की लोकांसाठी खरंच दिलासा? Read More »

मुंबई लोकल: नवी AC रेल्वे, पण प्रवाशांना खरंच हवी होती का?

मुंबईकरांसाठी “जीवनवाहिनी” म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन आता मेट्रो-स्टाईल AC गाड्यांमध्ये अपग्रेड होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं २३८ नवी AC लोकल देण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांमध्ये कुशन सीट्स, मोबाईल चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि १३० किमी वेगानं धावणारे डबे असतील.सरकार या निर्णयाचं मोठं यश म्हणून ढोल वाजवतंय, पण खरं चित्र वेगळंच सांगतं. 🚆 प्रवासी कुठे? सध्या मुंबईत दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी Non-AC लोकलने प्रवास करतात. तर AC लोकलचा वापर करणारे प्रवासी फक्त २ लाख (म्हणजे एकूण प्रवाशांपैकी ४%).👉 म्हणजे सरकारनं पैसा खर्च केला तो बहुसंख्य मुंबईकरांसाठी नाही, तर त्या ४% साठी! 💰 महसूल कुठून? कमी प्रवासी असूनही AC लोकल वार्षिक २१५ कोटींचा महसूल, म्हणजे पश्चिम रेल्वेच्या महसूलात तब्बल २२% वाटा देते.👉 त्यामुळे सरकारचा कल “कमाई करणाऱ्या” AC गाड्यांकडे, सामान्य Non-AC प्रवाशांकडे नाही, असं चित्र दिसतं. ⚡ “गर्दीत श्वास गुदमरणाऱ्या” Non-AC ला उपाय कुठे? मुंबईकरांना रोजच्या प्रवासात सर्वात मोठी समस्या म्हणजे गर्दी, खचाखच भरलेले डबे, तासन्तास उभं राहणं आणि सुरक्षिततेचा अभाव. ९६% प्रवासी Non-AC लोकलमध्येच प्रवास करतात. तरीही तिथं नवीन डब्यांची संख्या अपुरी, अपग्रेड्स मर्यादित. मग प्रश्न असा —सरकारला खरंच लोककल्याण महत्त्वाचं आहे का, की महसूल वसूल करणारा AC वर्ग? 🏷️ राजकीय गणित? नवे AC लोकल ट्रेनना “विकासाचं पॅकेज” म्हणून सादर करण्यात आलं आहे. मेट्रो-स्टाईल डिझाईन, एअर-कंडिशनिंग, लक्सरी इमेज — हे शहरी मध्यमवर्गीय व पर्यटकांना लुभावणारं पॅकेज. पण रोजच्या प्रवासात सामान्य प्रवासी अजूनही जुन्या Non-AC लोकलमध्येच कोंबले जातील. 👉 त्यामुळे टीकाकारांचं स्पष्ट मत —“गर्दी Non-AC मध्ये, कमाई AC मध्ये… आणि सरकारचं लक्ष महसुलावर, प्रवाशांच्या वेदनांवर नाही.”

मुंबई लोकल: नवी AC रेल्वे, पण प्रवाशांना खरंच हवी होती का? Read More »