प्रतिनिधी : कोकणधारा
कोकणासाठी मोठ्या आशेचा किरण ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा आता अचानक ठप्प झाली आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही सेवा, त्याच दिवशी बंद पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इतक्या चर्चेत असलेला हा प्रकल्प एवढ्या लवकर का बंद पडला?
यामागची कारणं आता समोर येऊ लागली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,
ही सेवा कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.
मात्र, तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकांनी या सेवेकडे पाठ फिरवली.
फक्त प्रवासच नाही,
तर बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत होता.
याशिवाय,
या बोटीत मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे समोर आले आहे.
शौचालय, बसण्याची सोय, विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा या बाबतीतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
एकीकडे मोठा गाजावाजा…
आणि दुसरीकडे अपुरी सेवा…
यामुळे प्रवाशांचा अनुभव समाधानकारक ठरला नाही.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,
या सेवेला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही.
दररोज ५० पेक्षाही कमी प्रवासी या सेवेचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
म्हणूनच,
प्रवाशांचा कमी प्रतिसाद,
महागडे तिकीट दर,
अपुर्या सुविधा
आणि वाढती नाराजी…
या सगळ्यांचा परिणाम म्हणून
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोट सेवा अखेर बंद पडल्याचं चित्र दिसत आहे.
आता प्रश्न असा आहे की,
कोकणासाठी महत्त्वाकांक्षी मानला गेलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार का?
की ही सेवा फक्त घोषणांपुरतीच मर्यादित राहणार?
याकडे आता कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.















