konkandhara.com

8 सितम्बर 2025

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन

बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत. बीडकरांचं स्वप्न अखेर साकार गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाची उत्सुकता शिगेला बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत. “बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन Read More »

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं – “लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?” नेमकं काय आहे प्रकरण? १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला. आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप Read More »