konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप
Image

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं –

“लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?”

नेमकं काय आहे प्रकरण?

१ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला.

आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती.

आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली…

ByByEditorial मार्च 20, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे