विशेष प्रतिनिधी, कोकणधारा
मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाला मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्याने या महामार्गाचे उद्घाटन करण्याबाबत आपल्यालाच संकोच वाटत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाबाबत अनेक वर्षांपासून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडत कामाला झालेल्या उशिराबद्दल खंत व्यक्त केली.
महामार्गाच्या कामातील अडथळे दूर करून काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई–गोवा मार्ग हा कोकणातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व वेगवान होणार आहे.



















