दिलप्रीत सिंहचा डबल स्ट्राईक; सुखजीत व अमित रोहिदासचे गोल; 2013 च्या फायनलमधील पराभवाचा बदला
नवी दिल्ली | भारतीय हॉकी संघानं दमदार खेळ करत दक्षिण कोरियाला 4-1 नं पराभूत करत आशिया कपवर चौथ्यांदा कब्जा केला. भारतासाठी दिलप्रीत सिंहनं दोन गोल केले, तर सुखजीत सिंह आणि अमित रोहिदासनं प्रत्येकी एक गोल नोंदवला. या विजयासह भारतानं 2013 मध्ये कोरियाविरुद्ध झालेल्या फायनल पराभवाचा बदला घेतला आहे.
सामना कसा रंगला?
पहिला क्वार्टर: सुखजीत सिंहनं पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, पण गोल करता आला नाही.
दुसरा क्वार्टर: जुगराज सिंह 2 मिनिटांसाठी सस्पेंड झाला तरीही कोरिया गोल करू शकला नाही. दिलप्रीत सिंहनं दुसरा गोल करत भारताला 2-0 ची आघाडी दिली.
हाफ-टाईम: भारत 2-0 ने आघाडीवर.
तिसरा क्वार्टर: दिलप्रीत सिंहचा दुसरा गोल; भारत 3-0 वर.
चौथा क्वार्टर: कोरियानं जोरदार प्रयत्न केले पण अमित रोहिदासनं भारताकडून चौथा गोल केला. अखेरीस सामना भारतानं 4-1 ने जिंकला.
भारताचा बदला पूर्ण
2013 च्या आशिया कप फायनलमध्ये दक्षिण कोरियानं भारताला 4-3 ने पराभूत केलं होतं. तब्बल 12 वर्षांनी भारतानं त्या पराभवाचा बदला घेतला आणि कोरियाला 4-1 अशा फरकानं हरवलं.