दोडामार्ग : भूषण सावंत:
पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेल्या दिरंगाईसोबतच अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात उसप येथील ग्रामस्थांनी आज, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले आहे.
प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. सदर रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कामाचा दर्जा खालावलेला असल्याने तसेच काम वेळेत पूर्ण होत नसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या उपोषणात खालील ग्रामस्थ सहभागी झाले आहेत श्री. देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक, सुनील गवस सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, रस्ता कामाची तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.















