konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Image

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्ग :भूषण सावंत : जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीत कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, मंजूर कामांअंतर्गत एकूण ८ लाख ४६ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख १३ हजार घनमीटर गाळ काढण्यात यश आले असून उर्वरित गाळ येत्या १० दिवसांत काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उर्वरित कामांसाठी अधिक यंत्रणा उपलब्ध करून गाळ काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत तेरेखोल नदीपात्रातील गाळ जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तातडीने काढण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत नदीपात्र गाळ काढण्याच्या एकूण १७ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ५ कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तर १२ कामे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. या कामांपैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून जिल्ह्यातील नदीपात्र गाळमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
तसेच आगामी सन २०२६-२७ या वर्षासाठी नदीपात्र गाळ काढण्याच्या नवीन प्रस्तावांचे अंदाजपत्रक तातडीने जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या या मोहिमेमुळे पूरस्थिती नियंत्रणास मदत होणार असून जलप्रवाह सुरळीत राहण्यासही मोठा हातभार लागणार आहे.
या बैठकीला कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, यांत्रिकी विभागाचे उप अभियंता श्री. चौगुले, नाम फाऊंडेशनचे दिग्विजय पाटील, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान
विरार-अलिबाग कॉरिडॉरमुळे पालघर-रायगड जवळ येईल