दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटींना थेट भिडण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आता निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी, अभिमन्यू फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असून, आरोग्य व्यवस्थेची खरी स्थिती जनतेसमोर उघड होणार आहे.
📅 बुधवार, २९ एप्रिल २०२६
⏰ सकाळी १०.०० ते दुपारी १.००
📍 स्थळ : बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद
“सिटीजन चार्टर कुठे हरवले?” — थेट सवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांमध्ये असलेली ढिसाळ व्यवस्था, तांत्रिक अडचणी आणि रुग्णांची होणारी परवड याविरोधात हा दरबार म्हणजे एक प्रकारचा जनतेचा आक्रोश ठरणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा सर्व स्तरांवरील सेवांबाबत नागरिकांना आपले प्रश्न, तक्रारी आणि सूचना थेट मांडण्याची संधी मिळणार आहे.
⚠️ प्रशासनाला थेट इशारा !
आरोग्य विभागाने सिटीजन चार्टरप्रमाणे सेवा देण्यात अपयश आले, तर जनतेचा संताप उफाळून येईल, असा इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे. हा दरबार केवळ चर्चा न राहता, ठोस निर्णय आणि जबाबदारी निश्चित करणारा मंच ठरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
🗣️ “पीडितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा”
जिल्ह्यातील पीडित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा घडवून आणण्यासाठी हा दरबार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
📞 तालुकानिहाय संपर्क व्यवस्था सज्ज
या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रतिनिधी आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले असून, नागरिकांनी आपल्या समस्या आधीच नोंदवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
💥 “जनतेचा दरबार, प्रशासनाचा हिशोब !”
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर थेट बोट ठेवणारा हा दरबार आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार की सुधारण्याची संधी, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे —
आता जनतेचा आवाज दाबला जाणार नाही !















