konkandhara.com

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार | शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

आंबा-काजू उत्पादकांचे नेतृत्व राजू शेट्टी करणार

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या बैठकीत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकदिलाने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. औषध फवारणी, खते, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, लाखो रुपयांचा खर्च होत असताना केवळ २२ हजार रुपयांची मदत अपुरी ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका आंबा बागेचा वार्षिक खर्च पाहता ही रक्कम फवारणीच्या एका टप्प्यासाठीही पुरेशी नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

वारंवार होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीमुळे कोकणातील शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. अशा परिस्थितीत सरकारची मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका करण्यात आली. तसेच पीकविमा कंपन्यांकडून होत असलेल्या अन्यायकारक वागणुकीबाबत आणि कर्जमाफीतील कठोर अटींबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी देवगड येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

या बैठकीस माजी आमदार बाळा माने, सुशांत नाईक, राजेंद्र गड्यान्नावर, विनायक कदम, प्रकाश साळवी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे