konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
मंडणगडमध्ये दुचाकी अपघात; झोपेच्या डुलकीमुळे एकाचा मृत्यू, एक जखमी

झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

मंडणगड (प्रतिनिधी) : पालघर ते कुंबळे दरम्यानच्या राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ रा. चिखलगाव, ता. दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, रा. मंडणगड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी जखमी विलास मोहिते यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित दुचाकी (एमएच ०८ एबी ४४२२) चालक कल्पेश आदावडे याला झोपेची डुलकी लागल्याने त्याने वाहनावरचे नियंत्रण गमावले. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवल्यामुळे वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन खड्ड्यात कोसळले आणि अपघात घडला.

या अपघातात दुचाकीस्वार आदावडे यांचा मृत्यू झाला असून ते स्वतःच्या मृत्यूस तसेच फिर्यादीच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंडणगड पोलीस स्थानकात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान