कोलाड २४ एप्रिल (शरद जाधव)
उद्योग जगतात मोठा गाजावाजा असलेल्या दर्शन कंपनीने सामाजिक बांधिलकीतून कोलाड येथील चिंचवली येथे टेकडीवर वृक्षारोपण केले होते. मात्र सदर झाडे वनव्यामध्ये जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या झाडांचे संवर्धन करण्यात सुदर्शन व्यवस्थापन या ठिकाणी फोल ठरली असून यामध्ये दोष वनव्याचा की कंपनीचा असा सवाल नागरिक करीत आहेत.
सुदर्शन कंपनीकडून सुधा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात .महिलांना रोजगार म्हणून शिवण क्लास ,शैक्षणिक उपक्रम ,स्वच्छता उपक्रम, वृक्षारोपण असे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन व सुधारण्याकरता विविध उपक्रम हाती घेतले जातात.
चिंचवली येथील टेकडी झाडा फुलांनी फुलवण्याचा संकल्प कंपनीने हाती घेतला होता. वृक्षारोपणाचा मोठा गाजावाजा झाला आम्ही ही टेकडी हिरवीगार करून या परिसराला हरितक्रांतीकडे नेऊ असे सांगण्यात आले .मात्र सदर झाडे दुर्लक्ष केल्याने वनव्यात जळून खाक झाली आहेत .
आजूबाजूला डोंगर आहे .गवत आहे. परिसर हा वनव्याचा असताना सुदर्शन कंपनी झाडांची काळजी घेतली पाहिजे होती. त्या ठिकाणी कायमस्वरूपी कामगार एखादी चौकी हवी होती परंतु कंपनीने दुर्लक्ष केले यावरून सुदर्शन कंपनीला सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ सामाजिक उपक्रमाच्या देखाव्याच्या घाट घालायचा होता का असे बोलले जाते
१९ ७२ च्या दशकात सुदर्शन सारखा कारखाना रोह्यात आला. लोकांना रोजगार मिळाला मात्र एक सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे जीवनमान किती गतिमान झाले हा चर्चेचा विषय ठरत आहे .सुदर्शन कंपनीचा उत्पादन बाबतीत बाहेरील देशात कारभार पोहचला आहे. हे कौतुकास्पद आहे. मात्र खरी सुरुवात सुदर्शन ची रोह्यातूनच सुरू झाली मात्र ते सामाजिक कामात रोहेकरांना विसरले
राठी समूहाने गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून राठी स्कूल ची स्थापना केली परंतु दर वर्षी वाढणारी फी पाहता या ठिकाणी गरीब मुलांनी शिक्षण घेऊ नये. असे राठी प्रशासनाने ठरवले की काय असे वाटू लागले आहे .
सुदर्शन कंपनीचे पक्के व्यापारी धोरण आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत व राष्ट्र उभारणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे. अशा रतन टाटा बिर्ला यांचा आदर्श घेत सुदर्शन कंपनीने स्थानिकांसाठी त्यांच्या उन्नती करता दर्जेदार काम केले पाहिजे. वनव्यात झाडे जळाली असली तरी कंपनीने ठरवले तर सदर टेकडी परत हिरवीगार होईल परंतु ती मानसिकता कंपनी दाखवणे आवश्यक आहे असे बोलले जात आहे.













