konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय
Image

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांचे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

या संपामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सलग चार दिवस सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील विविध शासकीय कामकाजावर परिणाम झाला होता. विशेषतः महसूल विभागाच्या कार्यालयांवर त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवला. मुद्रांक नोंदणी, जमीन व घर खरेदी-विक्री व्यवहार तसेच विवाह नोंदणीची कामे ठप्प झाली होती.

दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चेचे सत्र सुरू होते. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनांचे अधिकृत इतिवृत्त मिळावे, ही समन्वय समितीची प्रमुख मागणी होती. शुक्रवारी हे इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारने सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह इतर मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून त्यावर लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील जनतेची कामे ठप्प होऊ नयेत आणि शासकीय सेवांवर परिणाम होऊ नये, या दृष्टीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात आभासी पद्धतीने पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सर्व संबंधित संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.

Releated Posts

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य…

ByByEditorial मार्च 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले !
टीमवर्क आणि देशभक्तीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. अनिल काकोडकर
विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी
साखरपा-देवरुख मार्गावर भीषण अपघात;चौदा चाकी ट्रक डोंगराला धडकला, चालक जखमी
युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रत्नागिरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत
“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”
अपघात ग्रस्त आदिवासी कुटुंबाच्या मदती करता प्रमोद शेठ म्हसकर देवदूता सारखे धावून आले. दानशूर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक.
तुरुंगाची भीती की सत्तेची ओढ? आम आदमीपासून भाजपपर्यंतचा प्रवास
कोलाड येथे सुदर्शन कंपनीच्या झाडांना वनवा .दोष वनव्याचा की कंपनीचा.