konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही”
Image

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही”

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात,” असा टोला राऊतांनी लगावला. बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करणं म्हणजे ते त्यांच्या जवळचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्याचा प्रयत्न?

संजय राऊत म्हणाले,

“बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. याचा अर्थ ते त्यांचीच माणसं होती. पोलिसांना कारवाई थांबवायला सांगणं म्हणजे नियमांबाहेरचं काम. याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात.”

राऊतांनी अजित पवारांच्या भाषणातील मुद्दाही आठवला. “अजित पवार नेहमी म्हणतात मी नियमबाह्य काही करत नाही. मग या घटनेत पोलिसांना बेकायदेशीर कामांना संरक्षण का द्यावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं?

या प्रकरणात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना लक्ष्य करणाऱ्या आमदारांच्या पत्रावरही राऊतांनी टीका केली.

“त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? नियम आणि कायदा सांगणं हेच त्यांचं काम आहे. उपमुख्यमंत्र्यांना कायद्याचं भान करून दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय. हे दुर्दैवी आहे.”

“90% मंत्रिमंडळ खाली जाईल”

संजय राऊतांनी सरकारवर मोठा घणाघात करताना म्हटलं –

“नैतिकतेवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ घरी जाईल. शिंदे गटाचे सर्व मंत्री पदावर राहणार नाहीत. अजित पवारांचे मंत्रीसुद्धा टिकणार नाहीत. प्रत्येकावर आरोप आहेत, प्रत्येक जण बेकायदेशीर कामांत गुंतलेला आहे.”

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान