konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली
Image

छत्रपती संभाजीनगरात २२ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये कुटुंबीयांची माफी मागितली

मुंबई | छत्रपती संभाजीनगरातील अविष्कार कॉलनीत २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे असून ती फार्मास्युटिकल सायन्सची विद्यार्थिनी होती. काही महिन्यांपूर्वीच तिने वाळूज औद्योगिक परिसरातील एका औषध कंपनीत नोकरी सुरू केली होती.

आई-भावाला लिहिली सुसाइड नोट

मृत्यूपूर्वी निकिताने आई व भावाला उद्देशून सुसाइड नोट लिहली आहे. “मम्मी, भाऊ, दादा-दादी मला माफ करा. बाबा देखील मला सोडून गेले, मी आता जगून थकले आहे” असे भावनिक उद्गार तिने नोंदवले. आपल्या भावाला आईची काळजी घेण्याची विनंतीही तिने केली आहे.

जेवणासाठी बोलावलं पण उत्तर मिळालं नाही

राहुरी तालुक्यातील मूळची असलेली निकिता दोन मैत्रिणींसोबत अविष्कार कॉलनीत राहात होती. रविवारी तिच्या सहेल्या गावाला गेल्याने ती एकटी होती. रात्री दहा वाजता मित्रांनी तिला जेवणासाठी बोलावले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. निकिताच्या सुसाइड नोटमध्ये मृत्यूचं नेमकं कारण नमूद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात ११ ग्रामपंचायतींचे ठराव; आंदोलनाला अधिक धार

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या अडचणींमध्ये वाढ झाली…

ByByEditorial मार्च 20, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान